Rohit Pawar on Parth Pawar | मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? हायकोर्टाच्या सवालानंतर रोहित पवारांचा मोठा सल्ला, म्हणाले…

Rohit Pawar on Parth Pawar | मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? हायकोर्टाच्या सवालानंतर रोहित पवारांचा मोठा सल्ला, म्हणाले…

| Updated on: Sep 10, 2026 | 5:13 PM

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवारांनी पार्थ पवारांवर भाष्य केले आहे. उच्च न्यायालयाने पार्थ पवारांना आरोपी का केले नाही, असा सवाल पोलिसांना विचारला आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी पार्थ पवारांना वस्तुस्थिती मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेण्याचा सल्ला दिला आहे. अंजली दमानिया यांनीही सरकारला उच्च न्यायालयासमोर उत्तर द्यावे लागेल असे म्हटले आहे.

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात उच्च न्यायालयाने पोलिसांना गंभीर प्रश्न विचारला आहे, की पार्थ पवारांना या प्रकरणात आरोपी का केले नाही. उच्च न्यायालयाने पार्थ पवार यांच्या भूमिकेबाबत पोलिसांकडून स्पष्टीकरणही मागवले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी पार्थ पवारांवर भाष्य केले आहे.

रोहित पवारांनी पार्थ पवारांना लवकरात लवकर पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्याचा सल्ला दिला आहे. त्यांना आता भाजपचे राजकारण काय आहे, हे कळेल असेही रोहित पवारांनी म्हटले आहे. तसेच, उच्च न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पोलीस देतील, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, आता सरकारला उच्च न्यायालयात उत्तर द्यावेच लागेल. देवेंद्र फडणवीस सरकारने यापूर्वी या प्रकरणात राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवारांना का वाचवले, असा प्रश्नही दमानिया यांनी उपस्थित केला, कारण मुख्यमंत्रीच गृहमंत्री असल्याने त्यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत.

Published on: Sep 10, 2026 5:13 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us