मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांच्या महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi Government ),बाहेर पडण्याच्या भूमिकेनंतर राजकीय घडामोंडीना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar)यांनी राष्ट्रवादीच्या नेत्याची महत्त्वाची बैठक सुरु केली आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील(Jayant patil) व उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित आहेत. गेल्या दोन दिवसांपासून राजकीय घडामोडीना वेगे आला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 41 आमदारांनी बंडखोरी केल्याने राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला धोका निर्माण झाला आहे. बंडखोरी केलेल्या आमदारांना भरकटवण्याचे काम भाजप व ईडीचे षडयंत्र असल्याचा आरोप दवेंद्र भुयार यांनी केला आहे.