अगामी सुनावणी मंगळवारी, पण… कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

अगामी सुनावणी मंगळवारी, पण… कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Aug 13, 2026 | 5:44 PM

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षफुटी आणि आमदार अपात्रता प्रकरणी महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली, ज्यात कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय घेतला नाही, तसेच निवडणूक आयोगाने पक्षातील सर्वोच्च संस्थेचा विचार केला नाही, असे सिब्बल यांनी न्यायालयासमोर मांडले.

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षफुटी आणि आमदार अपात्रता प्रकरणी महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली, ज्यात कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय घेतला नाही, तसेच निवडणूक आयोगाने पक्षातील सर्वोच्च संस्थेचा विचार केला नाही, असे सिब्बल यांनी न्यायालयासमोर मांडले.

सुनावणीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या बाबतीत बेकायदेशीर आणि पक्षपाती काम केले असून, एका बेकायदा गटाला मान्यता देण्याचा प्रयत्न केला, असे राऊत म्हणाले. निवडणूक आयोगाने निर्णय आधीच ठरवला होता आणि त्यानंतर हे लोक गुवाहाटीला गेले, असा दावाही राऊत यांनी केला. राऊत यांच्या मते, सध्याचा निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा एजंट म्हणून काम करत आहे. त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयावर मात्र आपल्याला पूर्ण विश्वास असून, तेथेच न्याय मिळेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. अगामी सुनावणी मंगळवारी होणार असून आमदार व पक्षचिन्हाचा निर्णय लागेल. सत्य व धर्माच्या बाजूने असल्यामुळे विजय आमचाच होईल, असे राऊत यांनी सांगितले. पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे.

Published on: Aug 13, 2026 5:44 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us