ज्या राज्यात भाजपची सरकारे नाहीत, तिथे भाजप राज्यपालांच्या माध्यमातून सत्ता राबवण्याचा प्रयत्न करत आहे, असा घणाघाती हल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील काही जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते आढावा बैठक घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर राऊतांनी ही टीका केली.