AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut UNCUT | सरकारी तिजोरीचा अपहार? मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा; राऊतांच्या वक्तव्याने राजकारण ढवळून निघालं

Sanjay Raut UNCUT | सरकारी तिजोरीचा अपहार? मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा; राऊतांच्या वक्तव्याने राजकारण ढवळून निघालं

| Updated on: Jun 02, 2026 | 12:44 PM
Share

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या संख्येवरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. योजनेतून मोठ्या संख्येने महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या संख्येवरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. योजनेतून मोठ्या संख्येने महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अपात्र लाभार्थ्यांना सरकारी निधीतून लाभ देण्यात आल्याचा दावा करत त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच सरकारी तिजोरीच्या गैरवापराबाबत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

यावेळी राऊत यांनी राज्यातील निवडणूक प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणुकांमध्ये मतदारांना प्रभावित करण्यासाठी विविध योजना वापरण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी यासंदर्भात सखोल चौकशीची गरज व्यक्त केली. दरम्यान, आगामी राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राऊत म्हणाले की, एखादी निवडणूक पराभूत झाल्याने पक्ष कमकुवत होत नाही. सध्या पक्षबांधणीवर भर देण्यात येत असून भविष्यातील राजकीय परिस्थितीनुसार अनेक नेत्यांची भूमिका बदलू शकते, असे त्यांनी सूचित केले. शिवसेना पक्ष आणि आमदार अपात्रता प्रकरणावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. या प्रकरणाचा निकाल आपल्या बाजूने लागेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी काही नाराज नेत्यांनी पुन्हा पक्षात परतण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्याचा विचार केला जाईल, असे सांगितले.

दरम्यान, संजय राऊत यांच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता असून महायुतीकडून यावर काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 02, 2026 12:44 PM

Follow Us