एन. डी. पाटील यांच्या निधनामुळं महाराष्ट्रावर शोककळा पसरलीय. त्यांच्या निधनाची बातमी ऐकण्यास मन तयार होत नाही. एन.डी. पाटील हे राज्यातील चालतं बोलतं विद्यापीठ होतं. ते आंदोलनात उतरल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना दखल घ्यावी लागायची, असं राजू शेट्टी म्हणाले. टोल नाका प्रश्न, शेतकऱ्याचं आंदोलन, सीमा भागाचा लढा असेल, अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी लढा दिला, असं राजू शेट्टी म्हणाले.