मुंबई : जरंडेश्वर कारखान्यावर झालेल्या कारवाईनंतर दहा वर्षाच्या संघर्षाला यश मिळाले अशी प्रतिक्रिया पहिल्या संचालक शालिनीताई पाटील यांनी दिली आहे. कारखान्याचे फक्त तीन कोटी रुपये थकले होते. मात्र अजित पवारांनी पदाचा गैरवापर करुन हा कारखाना त्यांचे निकटवर्तीय घाटगे यांना दिला होता. त्यावर नियमबाह्य पद्धतीने कर्ज देण्यात आले होते. ईडीची कारवाई स्वागतार्ह आहे. दोषी लोकांवर कारवाई करुन कारखाना लवकरच सभासंदाकडे मिळेल अशी अशी अपेक्षा शालीनी पाटील यांनी व्यक्त केली आहे.