नाशिक : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलंय. “अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी अनेकांची इच्छा आहे. तसं असलं तरी ती आमच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही. ते असतं तर आमच्या सहकारी पक्षांना विश्वासात घेवून निर्णय घेतला असता”, असं शरद पवार म्हणाले आहेत. तसंच महाविकास आघाडीमध्ये कुठलाही वाद नाही. तिन्ही पक्षात सुसंवाद आहे, असंही शरद पवार म्हणालेत.