राज्यातील साखर कारखानदारी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहत असते, कधी एफआरपी, तर कधी कर्जदार आणि बंद कारखान्यांचा विषय ऐरणीवर येत असतो. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आज शेतकऱ्यांच्या देणी असल्यामुळे त्यांनी आज सांगितले की, आजपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांचे 1500 कोटी रुपये शेतकऱ्यांचे देणे असल्याचे त्यांनी सांगितले. साखर कारखानदारांकडून ही देणी असल्याने सात कारखान्यांवर कारवाई करण्यात आली असून आहे, कारखानदारांकडून देणी दिली गेली नाहीत तर साखर कारखानदारांवर कारवाई केली जाणार असल्याचेही शेखर गायकवाड यांनी सांगितले.