Uday Samant On Ward Restructure | प्रभाग रचना बदलण्याचा सरकारला नक्कीच अधिकार

| Updated on: Aug 05, 2022 | 9:29 PM

एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यांना सांगितले होते की, 3 सदस्यीय रचनेचा फायदा होणार नाही तर नुकसान होणार आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

Follow us on

Uday Samant On Ward Restructure | प्रभाग रचना बदलण्याचा सरकारला नक्कीच अधिकार - tv9

मुंबई : तीन सदस्यीय प्रभाग रचना असावी, असा निर्णय कॅबिनेटमध्ये झाला होता. मात्र कालपासून वेगळा मॅसेज फिरवला जात आहे की, हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना बदलला जात आहे हे चुकीचं आहे. नगरविकास खात्याने हा प्रस्ताव नियमानुसार आणला तरी देखील शिंदे यांनी 3 सदस्यांच्या प्रभाग रचनेला विरोध दर्शविला होता. परंतु मुख्यमंत्री आणि उप उपुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली त्यावेळी कॅबिनेट होत असल्याने 3 सदस्यीय प्रभाग रचनाबाबत निर्णय झाला. एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यांना सांगितले होते की, 3 सदस्यीय रचनेचा फायदा होणार नाही तर नुकसान होणार आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.