Video | आरक्षण विषयाचे राजकरण करु नये, हा एक सामाजिक समतेचा विषय : संजय राऊत

| Updated on: Jun 27, 2021 | 4:42 PM

आरक्षणाच्या मुद्द्याचे कोणीही राजकारण करु नये. हा एक सामाजिक समतेचा विषय आहे, असे राऊत म्हणाले.

Follow us on

मुंबई : सूत्रं हाती दिले तर ओबीसी आरक्षण मिळवून देतो असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 2014 साली धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर भाजपने याच प्रमाणे विधान केल्याचे आठवत आहे. पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देऊ, असे त्यावेळी भाजपने म्हटले होते. आरक्षणाच्या मुद्द्याचे कोणीही राजकारण करु नये. हा एक सामाजिक समतेचा विषय आहे, असे राऊत म्हणाले.