राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागावी…

| Updated on: Jul 30, 2022 | 10:23 PM

राज्यपाल हे पद घटनात्मक पद असल्याने त्या पदावरील व्यक्तीने बोलताना काळजी घेतली पाहिजे. पक्ष विरहित असणारे आणि राज्याचा पालक म्हणणारे हे पद आहे.

Follow us on

राज्यपाल हे पद घटनात्मक पद असल्याने त्या पदावरील व्यक्तीने बोलताना काळजी घेतली पाहिजे. पक्ष विरहित असणारे आणि राज्याचा पालक म्हणणारे हे पद आहे. राज्याच्या पालकाने राज्याची अवहेलना करणे हे घटनात्मक पदाची अवमान करण्यासारखे आहे आणि महत्त्वाची बाब अशी ही असं सगळं राजकारण चालू असताना सो कॉल स्वयंघोषित वंदनीय बाळासाहेबांचे वारसदार आम्ही तो वारसा कसा जपतोय असं म्हणणारे जी माणस आहेत या सगळ्या लोकांनी त्यांच्या त्या तथाकथी तुझी काही महाशक्ती आहे या महाशक्तीला शिफारस करून असा संवेदन शुन्य असणारा राज्यपाल त्यांनी परत बोलावून घ्यावा अशी मागणी शिवसेनेच्या उपगट नेत्या सुषमा अंधारे यांनी मागणी केली आहे.  जर कोषारींना असं वाटत असेल की नाही मी बोलता बोलण्याच्या ओघात बोलून गेलोय आणि तुम्ही विपर्यास करून घेत आहे तर महाराष्ट्राची त्यांनी माफी मागावी. आणि अशा राज्यपालांची महाराष्ट्राला गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. आणि त्यावर आता देवेंद्रजी फडणवीस यांनी  मलमपट्टी करू नये अशीही टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.