नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार आहे. त्याआधी अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी मतदारांना आश्वस्त केलंय. मला लोकांवर विश्वास आहे. मला चांगल्या मतांनी लोक निवडून देतील. निवडून आल्यावर त्यांचे प्रश्न सोडवणं माझी जबाबदारी असेल. त्यामुळे विजयी झाल्यावर अनेक प्रश्नांवर आंदोलन करेन, असा विश्वास शुभांगी पाटील यांनी व्यक्त केला. जनता जनार्दन असते. लोकशाहीत सर्वात जास्त लोकांच्या मताला किंमत असते.त्या जनतेने कुणाच्या अमिषाला, खोट्यानाट्या आश्वासनांना बळी पडू नये, असं आवाहनही शुभांगी पाटील यांनी केलंय.