अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबे यांना टोला लगावला आहे. “आता बलाढ्य खुर्चीदेखील हलायला लागली आहे. आम्ही तरी सामान्य दिसत असू परिस्थिती सामान्य असो आम्ही कामाच्या रूपाने बलाढ्य आहोत. तर बलाढ्य शक्तीला आता म्हणावं की नाही तिथे सामान्य जनतेचा विजय आहे. माझं बलिदान आणि माझं काम व्यर्थ जाऊ देणार नाही.मला भरघोस मतांनी विजय करणार आहे”, असं शुभांगी पाटील म्हणालेत.