मुंबई : कोरोनाशी दोन हात करण्यासाठी राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच निर्बंधांमुळे राज्यातील वाढत्या कोरोनारुग्णांची संख्या मंदावली आहे. मुंबईमध्ये तर रुग्णसंख्या बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्ट आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारचे कौतुक केले आहे. मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन कौतुक केले. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मुंबईमध्ये कोरोना टेस्ट कमी केल्या जात असून आभासी चित्र निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. याच पार्श्वभूमीवर हा स्पेशल रिपोर्ट….