Special Report | महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी की भाजप भारी ठरणार ?

| Updated on: May 24, 2022 | 10:38 PM

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील प्रलंबित 13 महानगरपालिकांच्या प्रभागांची आरक्षण सोडत काढण्याचे अधिसूचना जाहीर केली आहे. ज्यानंतर राजकीय पक्ष निवडणूका लक्षात घेऊन आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण गरम होत आहे.

Follow us on

मुंबई : राज्यातील निवडणूक रखडलेल्या पालिकांसाठी आता महत्वाची बातमी आली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. तर राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) राज्यातील प्रलंबित 13 महानगरपालिकांच्या प्रभागांची आरक्षण सोडत काढण्याचे अधिसूचना जाहीर केली आहे. त्यामुळे नवी मुंबई, वसई-विरारसह 13 महानगरपालिकांच्या निवडणूक आरक्षण सोडत कार्यक्रम येत्या 31 मे 2022 रोजी होणार आहे. आगामी काळात नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. तर या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation)होणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. मात्र या निवडणूका होत असताना काटेकी टक्कर फक्त शिवसेना – भाजपमध्येच होईल असेही म्हटले जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी बीकेसी मैदानावरून निवडणूकीच्या प्रचाराला सुरूवात केली होती. त्याच बीकेसी मैदानावरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रतित्योर दिले होते. तर पोलखोल मधून शिवसेनेवर आरोप केले होते. ज्यानंतर राष्ट्रवादी ही मैदाणात उतरली आणि पुण्यात भाजप विरोधात आंदोलन केले. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी की भाजप भारी ठरणार हे पहावं लागणार आहे.