पुणे : मुळशीच्या औद्योगिक वसाहतीत केमिकल कंपनीला भीषण आग लागली होती (Chemical Company Fire). या आगीत होरपळून जवळपास 15 महिलांसह 18 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील आगीच्या दुर्घटनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.यावर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी राज्यातील आगीच्या घटनांसाठी वेगळी टास्क फोर्स निर्माण केली पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे.