आळंदीत वारकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज; शिवसेनेच्या महिला नेत्याचा शिंदे-फडणवीस सरकारवर खरमरीत टीका
अनेकांना याचा सोशल मीडियावर निषेध केला आहे. तत राजकीय नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. यावरूनच शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून सरकारवर निशाणा साधला आहे.
पुणे : आळंदीत पालखीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांना याचा सोशल मीडियावर निषेध केला आहे. तत राजकीय नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. यावरूनच शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी, पालखीच्या पहिल्याच दिवशी या सोहळ्याला गालबोट लागला या घटनेचा आम्ही शिवसेना ठाकरे गट निशेध व्यक्त करतो असे म्हणाल्या. तर आज जो प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारी पूर्ण होईपर्यंत पोलिसांना योग्य त्या सूचना द्याव्या.’
Published on: Jun 12, 2023 9:22 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
