बुलढाणा : कापूस आणि सोयाबीनच्या दरवाढीसह पीकविमा अतिवृष्टीची नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करत आहे. रविकांत तुपकर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसह आंदोलन करणार आहे. रविकांत तुपकर यांनी सरकारला आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला आहे. काल रात्री 15 हजार शेतकऱ्याच्या खात्यावर 10 कोटी पिकविम्याचे जमा केल्यानंतरही रविकांत तुपकर आंदोलनावर ठाम आहेत. रविकांत तुपकर यांच्या निवासस्थानी आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात आहे.आज बुलढाण्यामध्ये स्वाभिमान शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे.