ऑलिम्पिक हॉकी स्पर्धेतील सर्वात तगडा संघ असणाऱ्या भारताला 1980 नंतर एकही पदक जिंकता आलं नव्हतं. पण हा 41 वर्षांचा दुष्काळ अखेर संपला असून भारतीय पुरुषांनी कांस्य पदक मिळवलं आहे. या विजानंतर संपूर्ण देशात जल्लोषाचं वातावरण आहे. महाराष्ट्रात देखील सर्वत्र जल्लोष केला जात आहे.