एकनाथ शिंदेंनी मोठी बंडखोरी करत राज्यातील महाविकास आघाडी सरकारला घरचा रस्ता दाखवला आहे. भाजपासोबत एकनाथ शिंदे गटाने सरकार स्थापन केलीयं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शपथ घेतली. त्यानंतर बऱ्याच दिवस राज्यातील मंत्री मंडळ विस्तार रखडल्याने सरकारवर टिका करण्यात येत होती. शेवटी राज्यात मंत्री मंडळ विस्तार झाला आणि खातेही वाटप करण्यात आली. खाते वाटपानंतर काही मंत्री नाराज असल्याच्या बातम्या पुढे येत होत्या. मात्र, शंभुराज देसाईंनी कोणीही नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे.