संदीप राजगोळकर, TV9 मराठी, प्रतिनिधी, नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या वतीने तुषार मेहता (Tushar Mehta) हे बाजू मांडत आहेत. यावेळी त्यांनी विविध मु्द्यांवर प्रकाश टाकला. अपात्रतेसंदर्भात (Maharashtra Government Politics Crisis) निर्णय घेताना राज्यपालांचाही सल्ला घेतला जावा, असं मेहता म्हणाले आहेत. निवडणूक आयोग राज्यपालांचं मत विचारात घेऊ शकतं, पण अंतिम निर्णय मात्र निवडणूक आयोगाचा असेल, असं मेहता म्हणाले आहेत.