मुंबईसह आसपासच्या परिसराला मागील काही दिवासांपासून मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी देखील साचले आहे. या पावसांत काहींना आपल्या जीवाला देखील मुकावे लागले. मागील काही दिवसांपासून साचलेल्या पाण्यामुळे अनेक अपघात होत असून भांडुपमध्येही दोघेजण थोडक्यात बचावले आहेत.