कोल्हापुरातील राड्यामुळे अंबाबाई मंदिरात भाविकांची संख्या घटली, व्यापाऱ्यांचं म्हणणं काय?

| Updated on: Jun 08, 2023 | 3:34 PM

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह पोस्टवरून कोल्हापुरातील वातावरण तापलं आहे. बुधवारी कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी प्रचंड मोर्चा काढला. यावेळी हजारो हिंदुत्ववादी कार्यकर्ते जमले होते.

Follow us on

कोल्हापूर : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह पोस्टवरून कोल्हापुरातील वातावरण तापलं आहे. बुधवारी कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी प्रचंड मोर्चा काढला. यावेळी हजारो हिंदुत्ववादी कार्यकर्ते जमले होते.त्यामुळे पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलक अधिकच आक्रमक झाले. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. दरम्यान, सध्या कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. जिल्ह्यात अफवांचं पेव फुटू नये म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पण या संपूर्ण घटनेचा फटका हा अंबाबाई मंदिरात जवळच्या व्यापरारांना बसला आहे. या राड्यामुळे अंबाबाई मंदिरात भाविकांची संख्या घटली आहे.