विनायक मेटेंचे आज सकाळी पहाटे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संभाजी राजे पनवेलकडे रवाना झाले. अपघातस्थळी आपात्कालीन सुविधा मिळू शकली नाही यामुळेच विनायक मेटेंचे निधन झाल्याचा मोठा आरोप संभाजी राजेंनी लावला आहे. विनायक मेटे हे मराठवाड्याचे सुपुत्र आणि मराठा समाजाचा बुलंद आवाज असल्याचे संभाजी राजे म्हणाले आहेत. राज्यात प्रत्येकजण विनायक मेटेंच्या असे जाण्याने आर्श्चय चकित आहेत. सर्वांसाठीच हा खुप मोठा धक्का म्हणाला लागेल. मुंबईला जात असताना हा अपघात झाल्यानंतर तब्बल एक तास मेटेंना अपघातस्थळी आपात्कालीन सुविधा मिळू शकली नसल्याचे आरोप केले जात आहेत.