उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर आता शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुंबईत दाखल होणार आहे. यावेळी बोलताना शिंदे म्हणाली की, हिंदुत्व टिकवण्यासाठी भाजपसोबत जाणं महत्वाचं महत्वाचे आहे. दुपारी 1 वाजता चार्टड फ्लाईटने शिंदे मुंबईत येत आहेत. त्यांच्यासोबत दीपक केसरकर आणि बच्चू कडूही असतील असं सांगितलं जात आहे. त्यामुळे वाकोला विमानतळावर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच शिंदे येण्याच्या आधी आणि वेळेला या ठिकाणी कुणालाही जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. शिंदे आल्यावर सर्वात अगोदर राज्यपालांच्या भेटीला जाणार असल्याचे कळते आहे.