“पुढील दोन दिवसात खाते वाटप होणार आहे. 20 मंत्री आणि जादा खाते असल्याने वाटपाला वेळ लागतोय.कायमस्वरूपी कोणते आणि नंतर येणाऱ्याला कोणते खाते द्यायचे यावरून वेळ लागतोय. जळगाव, वाशीम, गडचिरोली, नंदुरबारचे पालकमंत्री राहिलो त्यामुळे जी जबाबदारी देतील ती पार पाडेल. आदिवासी ना पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी धोरणात बदल करावे लागेल. हे सरकार दळणवळण सोयी उपलब्ध करून देणार आहे. मधल्या काळात काही कामं झाली नाहीत. कोणत्या राजकीय नेत्यावर आरोप होत नाहीत? न्यायालय आहे, सरकार आहे ते माझ्या बाबत निर्णय घेतील”, असं विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) म्हणालेत.