मुंबई – मी मागेच माझ्या भाषणात म्हणालो होतो, की हिंदुत्व (Hindu)विषयी बोललो होतो. रामायणामध्ये रामाणे कितीही मुंडकी उडवली तरी पुन्हा येत होती. तेव्हा रामाला कळाले की रावणाचा जीव बेंबीत आहे. तसेच काहीजण दिल्लीत(Delhi) बसले असले तरी त्यांचा जीव मुंबईतच त्याचे मुख्य कारण म्हणजे पैसे होय. राज्यपालानी हे आपल्या भाषणात खरे सांगितले. त्याबद्दल मी त्याचा आभारी आहे. तुमच्या मनातला तुमच्या ओठावर आले. मुंबईचे वैभव, मुंबईचा पैस आहे जो तुम्हाला गिळायचा आहे. अशी टीका उद्धव ठाकरे (Udhav Thakarey) यांनी केली आहे.