AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संकटकाळात मी काँग्रेसचा बाजीप्रभू देशपांडे : बाळासाहेब थोरात

काँग्रेस अडचणीत असताना अनेकजण सोडून गेले, पण मी काँग्रेसची खिंड बाजी प्रभू देशपांडेंसारखी लढवणार, असा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केला.

संकटकाळात मी काँग्रेसचा बाजीप्रभू देशपांडे : बाळासाहेब थोरात
| Updated on: Oct 08, 2019 | 5:42 PM
Share

अहमदनगर : काँग्रेस अडचणीत असताना अनेकजण सोडून गेले, पण मी काँग्रेसची खिंड बाजीप्रभू देशपांडेंसारखी (Baji Prabhu Deshpande) लढवणार, असा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केला. ते नगरमध्ये बोलत होते. इतिहास तोच घडवतो जो सातत्याने लढत राहतो. पळून जाण्यात काय अर्थ असा टोलाही थोरात (Balasaheb Thorat) यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना लगावला.

संगमनेर तालुक्यातील निर्झणेश्वर महादेव मंदिरात नारळ फोडून काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे, बाळासाहेब थोरात, आ.डॉ. सुधीर तांबे तसेच नगर जिल्हयातील काँग्रेसचे तीनही उमेदवार उपस्थित होते.

मी प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून दररोज 18 तास काम करत आहे. पडझडीच्या काळात राज्यातील मोठी जबाबदारी माझ्यावर आली आहे. बडे बडे जरी सोडून गेले तरी नविन कार्यकर्ते बडे होत आहेत. एवढ्या कठीण काळात कशाला अध्यक्षपद घेतलं असं अनेकजण म्हणत होते. पण इतिहास त्यांचाच होतो जो संकटाच्या काळात उभा राहतो.घर पेटलं तर तुम्ही पळून जाणे योग्य नाही, अशी खोचक टीका बाळासाहेब थोरात यांनी विखेंवर नाव न घेता केली.

या निवडणुकीत काँग्रेस नव्या जोमाने उभारी घेईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.आज जी परिस्थिती झाली तीच परिस्थिती 1999 साली काँग्रेसची झाली होती. मात्र तेव्हाही मी तत्व सोडून कधीही पक्ष सोडला नाही.पुढील काळात यश हे आपलं आहे असं थोरात म्हणाले.

सरड्यापेक्षा जास्त रंग बदलणारी माणसे महाराष्ट्रात आहेत. पक्षाध्यक्ष कुठे दिसत नाही म्हणणारे साडेचार वर्षे विरोधी पक्षनेते होते का? कारण विरोध करताना ते कुठे दिसलेच नाहीत, अशी टीकाही थोरातांनी विखेंवर केली.

शिवसेना भाजप हे अपयशी सरकार ठरलं आहे. खोटी कर्जमाफी, विम्याचा लाभ खासगी कंपन्यांना, उद्योग बेरोजगारी आणि शेतकरी असे गंभीर प्रश्न राज्याला सतावत आहेत. मूलभूत प्रश्नावर सरकारकडे उत्तर नाही, असंही थोरात म्हणाले.

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.