AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राला लागलेली धूळ आणि घाण पाऊस वाहून नेईल : अविनाश जाधव

आज पडणारा पाऊस हा राज्यातील घाण आणि महाराष्ट्राला लागलेली धूळ वाहून जाण्यासाठी पडत असल्याचं वक्तव्य मनसेचे ठाण्यातील उमेदवार अविनाश जाधव यांनी केलं.

महाराष्ट्राला लागलेली धूळ आणि घाण पाऊस वाहून नेईल : अविनाश जाधव
| Edited By: | Updated on: Oct 21, 2019 | 2:14 PM
Share

ठाणे : ठाणे विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. राज्याला लागलेली घाण आणि महाराष्ट्रातील धूळ वाहून जाण्यासाठी पाऊस पडत आहे, असं मत अविनाश जाधव (Thane MNS Avinash Jadhav) यांनी व्यक्त केलं.

गेल्या पाच वर्षांत ठाणेकरांना आमदार दिसले नाहीत. त्यांनी काही कामं केलेली नाहीत. त्यामुळे मतदारांमध्ये एक राग आहे, रोष आहे. तो चेहऱ्यावर दिसतोय. त्यामुळे बदल नक्की होईल, अशी आशा अविनाश जाधव यांनी ‘टीव्ही9 मराठी’ शी बोलताना व्यक्त केली.

आज पडणारा पाऊस हा राज्यातील घाण आणि महाराष्ट्राला लागलेली धूळ वाहून जाण्यासाठी पडत असल्याचं वक्तव्यही जाधव यांनी केलं. ठाणेकरांनी जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहनही अविनाश जाधव यांनी यावेळी केलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई-ठाण्यासह राज्यभरात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. पावसाचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात होती.

‘मराठी माणसाच्या विकासासाठी, मराठी माणसाच्या पाठी खंबीर उभे राहण्यासाठी मला मतदान करा. ठाण्यात कुठल्याही प्रकराचं काम झालं नाही. जो माणूस पाच वर्ष दिसला नाही, तो पुढची पाच वर्षं काय काम करणार आहे. नागरिकांनी माझा आवाज बुलंद करण्यासाठी मला मतदान करा.’ असंही आवाहन अविनाश जाधव (Thane MNS Avinash Jadhav) यांनी केलं.

विधानसभा निवडणूक : 36 जिल्ह्यातील 101 लक्षवेधी लढती

ठाणे मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर यांना महायुतीने रिंगणात उतरवलं आहे. त्यांच्याविरोधात मनसेने अविनाश जाधव यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीने या मतदारसंघात उमेदवार न देता मनसेला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे सर्वपक्षीय ताकद पाठीशी असलेल्या अविनाश जाधव यांना मतदार कौल देतात का, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.