AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परदेश दौऱ्यावर क्रिकेटर्स त्यांच्या पत्नी व मुलांना घेऊन जातात, पण त्याचा खर्च कोण उचलतं?

भारतीय क्रिकेटपटू जेव्हा परदेश दौऱ्यावर जातात, तेव्हा अनेक वेळा त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी किंवा कुटुंबीयही दिसतात. हे दृश्य अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण करतं या ट्रिपचा खर्च कोण उचलतो? बीसीसीआय की स्वत: क्रिकेटर? चला जाणून घेऊया

परदेश दौऱ्यावर क्रिकेटर्स त्यांच्या पत्नी व मुलांना घेऊन जातात, पण त्याचा खर्च कोण उचलतं?
virat kohli and rohit sharma
| Edited By: | Updated on: Jul 17, 2025 | 3:32 PM
Share

भारतीय क्रिकेट संघ जेव्हा परदेश दौऱ्यावर असतो, तेव्हा अनेकदा खेळाडूंच्या पत्नी, मुले आणि कधी कधी पालकही त्यांच्या सोबत दिसून येतात. सामन्यांच्या वेळेस हे कुटुंबीय स्टेडियममध्ये उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसतात. ही परंपरा आता सामान्य झाली असली, तरी काही वर्षांपूर्वी ही फारशी प्रचलित नव्हती. परंतु, कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात हे प्रमाण वाढलं. त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याला आणि व्यावसायिक आयुष्याला योग्य समन्वय देण्याचा आग्रह धरला आणि पत्नीबरोबर ट्रॅव्हल करणे सामान्य गोष्ट झाली. त्यांच्यानंतर सध्याचे कर्णधार रोहित शर्मा देखील पत्नी आणि मुलीसोबत अनेक परदेश दौर्‍यांवर जाताना दिसतात.

पण इथं एक प्रश्न सर्वसामान्य प्रेक्षकांना नेहमी पडतो या परदेश दौऱ्यांवर खेळाडूंच्या कुटुंबाचा खर्च नेमका कोण उचलतो? त्यांची विमानतिकीट, हॉटेल, खाण्यापिण्याचा खर्च, आणि बाकी सोयी-सुविधांची जबाबदारी नेमकी कोण घेते?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, म्हणजेच BCCI ( Board of Control for Cricket in India ) हे खेळाडूंच्या कुटुंबाच्या परदेश प्रवासासाठी काही ठरावीक अटींनुसार खर्च उचलते. जर दौरा 45 दिवसांहून अधिक कालावधीचा असेल, तर खेळाडूंच्या कुटुंबाला फक्त 14 दिवसांची परवानगी दिली जाते. त्या 14 दिवसांमध्ये बीसीसीआय संपूर्ण प्रवासाचा खर्च उचलते. मात्र, जर कुटुंब त्या कालावधीपेक्षा अधिक दिवस खेळाडूंबरोबर थांबले, तर त्या अधिकच्या दिवसांचा खर्च खेळाडू किंवा त्याचे कुटुंब स्वतः करतात.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही 14 दिवसांची मुभा फक्त एकदाच दिली जाते. याचा अर्थ असा की जर दौऱ्यात पुढे एखादा ब्रेक असेल, तरी पुन्हा परवानगी किंवा खर्चाची जबाबदारी बीसीसीआय घेत नाही. त्याचप्रमाणे छोट्या दौऱ्यांमध्ये, जसे की 15-20 दिवसांचे दौरे, त्यात फक्त 7 दिवसांची परवानगी दिली जाते.

नवे नियम

भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही बीसीसीआयच्या या धोरणाला समर्थन दिलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की खेळाडूंनी आपल्या प्राथमिकतेत खेळ ठेवायला हवा, आणि कौटुंबिक उपस्थिती ही फक्त मर्यादित काळासाठी असावी. यापूर्वी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान संघाच्या सुमार कामगिरीनंतर बीसीसीआयने कडक नियम लागू केले होते.

नवीन धोरणांनुसार, कोणताही खेळाडू पूर्ण टूर्नामेंटदरम्यान पत्नी किंवा कुटुंबासोबत राहू शकत नाही. हे फक्त 14 किंवा 7 दिवसांपुरतं मर्यादित आहे. यामागील उद्देश असा आहे की खेळाडूंनी पूर्ण लक्ष आपल्या कामगिरीवर केंद्रित करावं.

संपूर्ण पाहिलं तर, खेळाडूंच्या कुटुंबीयांसोबत परदेश दौर्‍यावर जाण्याची संधी आता अधिक नियंत्रित आणि शिस्तबद्ध झाली आहे. बीसीसीआयने खर्चाची जबाबदारी उचलली असली तरी त्यासाठी त्यांनी काही स्पष्ट नियम आखून दिले आहेत. या निर्णयामुळे खेळाडूंना मानसिक आधार तर मिळतोच, पण एकाग्रतेलाही बाधा येऊ नये याची खातरजमा केली जाते. एकंदर, या व्यवस्थेने क्रिकेट आणि कौटुंबिक जीवनात योग्य तो समतोल साधण्याचा प्रयत्न केला जात आहे जे केवळ मैदानावर नव्हे, तर खेळाडूंच्या मानसिकतेतही सकारात्मक बदल घडवून आणू शकतो.

... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.