AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmer : सरकारचा एक निर्णय अन् शेतकरी चिंतामुक्त, शेत जमीन खरेदी-विक्रीमध्ये अमूलाग्र बदल

सरकारच्या या नियमामुळे शेतीचे खरेदी-विक्री हे व्यवहारच ठप्प झाले होते. अशा परस्थितीमध्ये शेतकऱ्याने जर प्रांतधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी घेतली तर मात्र, व्यवहार होत होते.

Farmer : सरकारचा एक निर्णय अन् शेतकरी चिंतामुक्त, शेत जमीन खरेदी-विक्रीमध्ये अमूलाग्र बदल
शेत जमीन खरेदी-विक्रेचे व्यवहार
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Sep 22, 2022 | 3:16 PM
Share

सोलापूर : शेतकऱ्यांची शेत जमीन (Farm Land) असतानाही विक्रीबाबत मात्र, शासनाचे नियम आहे. मध्यंतरी शासनाने (Government) केलेल्या नवीन नियमामुळे जमिन विक्री (Sale of Land) करणेही मुश्किल झाले होते. बागायतीसाठी 20 आणि जिरायतीसाठी 40 अशी अट घालून देण्यात आली होती. आता तुकडेबंदी-तुकडेजोड कायदा 1947 मध्ये बदल करुन जिरायतीसाठी 20 गुंठे आणि बागायतीसाठी 5 गुंठेची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. त्यामुशे शेतजमिनीचे व्यवहार करणे सोपे होणार आहे.

जमीन खरेदी-विक्रीवरुन ग्रामीण भागात आजही वाज-विवाद हे सुरुच आहेत. असे असतानाच जिरायत जमीन ही 2 एक्करपेक्षा कमी असल्यास विकता येणार नाही तर बागायत जमीन ही 20 गुंठे म्हणजे 1 एका एकरापेक्षा कमी असली तर विकता येत नव्हती.

एवढेच नाही तर, 2 एकराच्या गटातील 5 ते 6 गुंठे जमीन देखील विकता येत नव्हती.त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. शेतातील वाटेवरुन आणि बांधावरुनही भांडण-तंटे ही वाढले होते.

सरकारच्या या नियमामुळे शेतीचे खरेदी-विक्री हे व्यवहारच ठप्प झाले होते. अशा परस्थितीमध्ये शेतकऱ्याने जर प्रांतधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी घेतली तर मात्र, व्यवहार होत होते. त्यामुळे असे का हा आवाज शेतकऱ्यांनी उठवला.

परवानगीशिवाय खरेदी-विक्री का होऊ शकत नाही असे का म्हटल्यावर यामध्ये बदल करण्यात आला आहे. त्यापूर्वी सूचना आणि हरकतीही मागवण्यात आल्या होत्या. हजारहून अधिक आलेल्या हरकरतींचा विचार करुन हा निर्णय माघे घेण्यात आला आहे.

नागरिकांच्या सूचना आणि हरकती ह्या राज्य शासनाकडे पाठवण्यात आल्या आहेत. नियमामध्ये बदलाचा प्रस्तावही दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रस्तावावर ऑक्टोंबर महिन्यात निर्णय होईल अशी अपेक्षा आहे.

शेती खरेदीसाठी शासनाने मर्यादा घालून दिली आहे. मर्यादेपेक्षा कमी क्षेत्रावरील जमिन विकत घेता येत नव्हती. शासनाने यांबाबत मर्यादा काढण्यासीठी शेतकरी आणि इतर नागरिकांनी पाठपुरावा केला असून त्यामुळेच खरेदी-विक्रीमध्ये बदल होत आहे.

Follow Us
दक्षिणेकडे भाजपला मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याचा अचानक राजीनामा
दक्षिणेकडे भाजपला सर्वात मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याने अचानक दिला राजीनामा अन्...
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची बीएलए नियुक्तीत उदासीनता
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची उदासीनता. बीएलए नियुक्तीत राजकीय पक्षांचे दुर्लक्ष
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट...
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट म्हणाले...
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... मोठी खळबळ
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... नवनाथ वाघमारांचे वादग्रस्त विधान; मराठा समाज आक्रमक, थेट...
वैद्यनाथ मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची अलोट गर्दी
श्रावण सोमवार आणि नागपंचमीनिमित्त वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर उजळून निघाले, भक्तांकडून जलाभिषेक
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप:
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी: मुंडेगाव ते पाडळीपर्यंत वाहनांच्या रांगा
संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
नाशिकमधील खड्डे पाहणीदरम्यान संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...