Agricultural : शेती पारंपरिक पण उत्पन्न लाखोंमध्ये, अल्पभूधारक शेतकऱ्याने कशी साधली किमया?

यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे केवळ हंगामी पिकाचेच नव्हे तर बागायती क्षेत्राचेही मोठे नुकसान झाले आहे. पण माळरानावरील पपई बागेला याचा धोका निर्माण झाला नव्हता. त्यामुळेच उत्पादनात वाढ झाली आहे.

 Agricultural : शेती पारंपरिक पण उत्पन्न लाखोंमध्ये, अल्पभूधारक शेतकऱ्याने कशी साधली किमया?
माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्याने पपईतून विक्रमी उत्पन्न घेतले आहे.
Follow us
| Updated on: Sep 23, 2022 | 4:42 PM

पंढरपूर : काळाच्या ओघात शेती पद्धतीमध्ये (Agricultural practices) बदल झाला तरी, निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात वाढ होईलच असे नाही. त्यामुळे उत्पादनाची शाश्वती शक्य नाही. अशा प्रतिकूल परस्थितीमध्येही माळशिरस तालुक्यातील एका अल्पभूधारक (Small holder farmer) शेतकऱ्याने पावने दोन एकरामध्ये तब्बल 22 लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. केवळ पावने दोन एकरामध्ये बाळासाहेब आणि रामदास सरगर या बंधूनी पपईची लागवड (Papaya) केली होती. आठ महिने अथक परीश्रम आणि योग्य नियोजन करुन सरगर बंधू यांना तब्बल 22 लाखाचे उत्पन्न मिळवले आहे.त्यामुळे शेती तोट्यात असे म्हणाऱ्यांना अद्दल घडवूण आणणारा हा प्रयोग सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

माळशिरस हा दुष्काळी पट्ट्यातील तालुका आहे. येथील कन्हेर गावातील बाळासाहेब आणि रामदास सरगर या बंधूने आपल्या पावणे दोन एकर शेतीमध्ये आठ महिन्यापूर्वी पपईची लागवड केली. 2100 रोपांमधून आज संपूर्ण पपईची बाग फुलली गेली.

सरगर यांच्या पपई बागेतील एका झाडाला अंदाजे 80 ते 90 फळ लागले आहे. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील जिराईत शेतीला आता बागायतीचे स्वरूप आले आहे. योग्य नियोजन आणि अथक परीश्रम यामधून हे साध्य झाले आहे.

कन्हेर गावच्या माळरानावरील पपईला आता परराज्यातून मागणी होत आहे. चेन्नई आणि कोलकत्ता येथून सरगर यांच्या पपईला मागणी आहे. उत्पादनात घट आणि मागणी अधिक यामुळे पपईला अधिकचा दर मिळाला आहे.

रासायनिक खतांचा वापर न करता संपूर्णपणे पारंपारिक आणि सेंद्रिय शेतीचा अवलंब करून सरगर बंधूने केलेली किमया सध्या इतर शेतकऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. हा प्रयोग सेंद्रिय शेतीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे केवळ हंगामी पिकाचेच नव्हे तर बागायती क्षेत्राचेही मोठे नुकसान झाले आहे. पण माळरानावरील पपई बागेला याचा धोका निर्माण झाला नव्हता. त्यामुळेच उत्पादनात वाढ झाली आहे.

Non Stop LIVE Update
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.