AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

 Agricultural : शेती पारंपरिक पण उत्पन्न लाखोंमध्ये, अल्पभूधारक शेतकऱ्याने कशी साधली किमया?

यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे केवळ हंगामी पिकाचेच नव्हे तर बागायती क्षेत्राचेही मोठे नुकसान झाले आहे. पण माळरानावरील पपई बागेला याचा धोका निर्माण झाला नव्हता. त्यामुळेच उत्पादनात वाढ झाली आहे.

 Agricultural : शेती पारंपरिक पण उत्पन्न लाखोंमध्ये, अल्पभूधारक शेतकऱ्याने कशी साधली किमया?
माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्याने पपईतून विक्रमी उत्पन्न घेतले आहे.
| Edited By: | Updated on: Sep 23, 2022 | 4:42 PM
Share

पंढरपूर : काळाच्या ओघात शेती पद्धतीमध्ये (Agricultural practices) बदल झाला तरी, निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात वाढ होईलच असे नाही. त्यामुळे उत्पादनाची शाश्वती शक्य नाही. अशा प्रतिकूल परस्थितीमध्येही माळशिरस तालुक्यातील एका अल्पभूधारक (Small holder farmer) शेतकऱ्याने पावने दोन एकरामध्ये तब्बल 22 लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. केवळ पावने दोन एकरामध्ये बाळासाहेब आणि रामदास सरगर या बंधूनी पपईची लागवड (Papaya) केली होती. आठ महिने अथक परीश्रम आणि योग्य नियोजन करुन सरगर बंधू यांना तब्बल 22 लाखाचे उत्पन्न मिळवले आहे.त्यामुळे शेती तोट्यात असे म्हणाऱ्यांना अद्दल घडवूण आणणारा हा प्रयोग सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

माळशिरस हा दुष्काळी पट्ट्यातील तालुका आहे. येथील कन्हेर गावातील बाळासाहेब आणि रामदास सरगर या बंधूने आपल्या पावणे दोन एकर शेतीमध्ये आठ महिन्यापूर्वी पपईची लागवड केली. 2100 रोपांमधून आज संपूर्ण पपईची बाग फुलली गेली.

सरगर यांच्या पपई बागेतील एका झाडाला अंदाजे 80 ते 90 फळ लागले आहे. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील जिराईत शेतीला आता बागायतीचे स्वरूप आले आहे. योग्य नियोजन आणि अथक परीश्रम यामधून हे साध्य झाले आहे.

कन्हेर गावच्या माळरानावरील पपईला आता परराज्यातून मागणी होत आहे. चेन्नई आणि कोलकत्ता येथून सरगर यांच्या पपईला मागणी आहे. उत्पादनात घट आणि मागणी अधिक यामुळे पपईला अधिकचा दर मिळाला आहे.

रासायनिक खतांचा वापर न करता संपूर्णपणे पारंपारिक आणि सेंद्रिय शेतीचा अवलंब करून सरगर बंधूने केलेली किमया सध्या इतर शेतकऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. हा प्रयोग सेंद्रिय शेतीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे केवळ हंगामी पिकाचेच नव्हे तर बागायती क्षेत्राचेही मोठे नुकसान झाले आहे. पण माळरानावरील पपई बागेला याचा धोका निर्माण झाला नव्हता. त्यामुळेच उत्पादनात वाढ झाली आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.