AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

 Agricultural : शेती पारंपरिक पण उत्पन्न लाखोंमध्ये, अल्पभूधारक शेतकऱ्याने कशी साधली किमया?

यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे केवळ हंगामी पिकाचेच नव्हे तर बागायती क्षेत्राचेही मोठे नुकसान झाले आहे. पण माळरानावरील पपई बागेला याचा धोका निर्माण झाला नव्हता. त्यामुळेच उत्पादनात वाढ झाली आहे.

 Agricultural : शेती पारंपरिक पण उत्पन्न लाखोंमध्ये, अल्पभूधारक शेतकऱ्याने कशी साधली किमया?
माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्याने पपईतून विक्रमी उत्पन्न घेतले आहे.
| Edited By: | Updated on: Sep 23, 2022 | 4:42 PM
Share

पंढरपूर : काळाच्या ओघात शेती पद्धतीमध्ये (Agricultural practices) बदल झाला तरी, निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात वाढ होईलच असे नाही. त्यामुळे उत्पादनाची शाश्वती शक्य नाही. अशा प्रतिकूल परस्थितीमध्येही माळशिरस तालुक्यातील एका अल्पभूधारक (Small holder farmer) शेतकऱ्याने पावने दोन एकरामध्ये तब्बल 22 लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. केवळ पावने दोन एकरामध्ये बाळासाहेब आणि रामदास सरगर या बंधूनी पपईची लागवड (Papaya) केली होती. आठ महिने अथक परीश्रम आणि योग्य नियोजन करुन सरगर बंधू यांना तब्बल 22 लाखाचे उत्पन्न मिळवले आहे.त्यामुळे शेती तोट्यात असे म्हणाऱ्यांना अद्दल घडवूण आणणारा हा प्रयोग सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

माळशिरस हा दुष्काळी पट्ट्यातील तालुका आहे. येथील कन्हेर गावातील बाळासाहेब आणि रामदास सरगर या बंधूने आपल्या पावणे दोन एकर शेतीमध्ये आठ महिन्यापूर्वी पपईची लागवड केली. 2100 रोपांमधून आज संपूर्ण पपईची बाग फुलली गेली.

सरगर यांच्या पपई बागेतील एका झाडाला अंदाजे 80 ते 90 फळ लागले आहे. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील जिराईत शेतीला आता बागायतीचे स्वरूप आले आहे. योग्य नियोजन आणि अथक परीश्रम यामधून हे साध्य झाले आहे.

कन्हेर गावच्या माळरानावरील पपईला आता परराज्यातून मागणी होत आहे. चेन्नई आणि कोलकत्ता येथून सरगर यांच्या पपईला मागणी आहे. उत्पादनात घट आणि मागणी अधिक यामुळे पपईला अधिकचा दर मिळाला आहे.

रासायनिक खतांचा वापर न करता संपूर्णपणे पारंपारिक आणि सेंद्रिय शेतीचा अवलंब करून सरगर बंधूने केलेली किमया सध्या इतर शेतकऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. हा प्रयोग सेंद्रिय शेतीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे केवळ हंगामी पिकाचेच नव्हे तर बागायती क्षेत्राचेही मोठे नुकसान झाले आहे. पण माळरानावरील पपई बागेला याचा धोका निर्माण झाला नव्हता. त्यामुळेच उत्पादनात वाढ झाली आहे.

Follow Us
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री..
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका.
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी.
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार.
मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटः 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचा खळबळजनक दावा
मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटः 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचा खळबळजनक दावा.
ठाकरे–फडणवीस गुप्त भेटीच्या चर्चांवर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण
ठाकरे–फडणवीस गुप्त भेटीच्या चर्चांवर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण.
ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट, 'अनेक नेते आमच्या संपर्कात, त्यापैकी...'
ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट, 'अनेक नेते आमच्या संपर्कात, त्यापैकी...'.
बागेश्वर बाबाच्या '४ मुले जन्माला घाला' वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस...
बागेश्वर बाबाच्या '४ मुले जन्माला घाला' वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस....
विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, शिरसाटांचा मोठा दावा- ठाकरेच उमेदवार
विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, शिरसाटांचा मोठा दावा- ठाकरेच उमेदवार.
राघव चड्ढा यांच्यासारखं... पंजाबमधील घडामोडींवर भाजप नेत्याचं मोठं विध
राघव चड्ढा यांच्यासारखं... पंजाबमधील घडामोडींवर भाजप नेत्याचं मोठं विध.