AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan: 10.90 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 1 लाख 37 हजार कोटी वर्ग, केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये पाठवले जातात. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आतापर्यंत 30 महिने पूर्ण झाले आहेत. (PM Kisan Scheme )

PM Kisan: 10.90 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 1 लाख 37 हजार कोटी वर्ग, केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती
पीएम किसान योजना
| Edited By: | Updated on: Jun 11, 2021 | 3:07 PM
Share

नवी दिल्ली: पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत 10.90 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत 1 लाख 37 हजार 192 कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ही माहिती दिली आहे. नरेंद्र सिंह तोमर यांनी या योजनेची सुरुवात 2019 झाली होती, अशी माहिती दिली आहे. पीएम किसान सन्मान योजनेद्वारे एका वर्षात 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात येतात. सरकारनं आतापर्यंत 8 हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेली आहे. शेतकऱ्यांना आठव्या हप्त्याची रक्कम देण्याचं काम सुरु असून ते 31 जुलैपर्यंत पूर्ण केलं जाणार आहे. पीएम किसान सन्मान योजनेच्या नवव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयानं तयारी सुरु केली आहे. (Agriculture Minister Narendra Singh Tomar said one lakh 37 thousand crore rupees transfer to farmers account under PM Kisan)

पीएम किसान सन्मान योजनेला 30 महिने पूर्ण

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये पाठवले जातात. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आतापर्यंत 30 महिने पूर्ण झाले आहेत. आठव्या हप्त्याची रक्कम 31 जुलैपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. आता पीएम किसान योजनेच्या ननव्या हप्त्याची तयारी सुरू झाली आहे. शेतकरी संघटनांकडून या मदतीची रक्कम वाढवण्याची मागणी केली जात आहे.

पीएम किसान योजनेचा नववा हप्ता ऑगस्टपासून

पीएम किसान सन्मान योजनेचा नवव्या हप्त्याची तयारी ऑगस्टपासून केली जाणार आहे. याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी अद्याप या योजनेमध्ये नोंदणी केली नाही. त्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन देखील करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांनी आता नोंदणी केली आणि त्यांच्या अर्जाची पडताळणी झाल्यास त्यांना आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये देखील मिळू शकतात. पीएम किसान सन्मान योजनेसाठी ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येते. गेल्या दोन महिन्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर 21 हजार कोटी रुपये पाठवण्यात आले आहे.

सर्वात यशस्वी योजना

मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयानुसार पीएम किसान सन्मान योजना सुरुवात करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये पाठवले जातात. शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी ही मदत वाढवून वार्षिक 24000 करावी, अशी मागणी केली आहे.

संबंधित बातम्या:

मान्सून दाखल, महाबीज शेतकऱ्यांना बियाण्याचं वाटप कधी करणार? रासायनिक खतांचाही तुटवडा

खरिप हंगामासाठी किमान आधारभूत किमती जाहीर, कोणत्या पिकाची MSP सर्वाधिक वाढली?

(Agriculture Minister Narendra Singh Tomar said one lakh 37 thousand crore rupees transfer to farmers account under PM Kisan)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.