AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agriculture News : अवकाळी पावसामुळे बळीराजाची दयनीय अवस्था, अद्याप पंचनामे न झाल्याने शेतकरी हवालदिल

राज्यात अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग मोठ्या चिंतेत आहे. अनेक फळबागा उद्धवस्त झाल्या आहेत. काही ठिकाणी अद्याप पंचनामे झाले नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

Agriculture News : अवकाळी पावसामुळे बळीराजाची दयनीय अवस्था, अद्याप पंचनामे न झाल्याने शेतकरी हवालदिल
Image Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Mar 09, 2023 | 8:11 AM
Share

अनिल केऱ्हाळे, जळगाव : मागच्या आठवडाभरात राज्यात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) शेतकऱ्यांचं (Farmer)मोठं नुकसान झालं आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत असल्याचं समजतंय. द्राक्षांच्या बागा आणि हातातोंडाशी आलेलं रबी पिकाचं नुकसान झाल्यामुळे घेतलेलं कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिला आहे. जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांचं (jalgaon farmer news) मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हजारो हेक्टर वरील पिके आडवी झाली आहेत, मात्र अद्यापही शासनाच्या एकही प्रतिनिधी बांधावर फिरकला नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचं चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. आता तोंडाशी आलेला घाट फिरवला गेल्याने कर्जाचे हप्ते व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या चिंतेत शेतकरी वर्ग आहे.

दोन ते तीन दिवस उलटूनही अद्यापही पंचनामे

राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसला असून या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातही वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टर वरील पिके आडवी झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तातडीचे पंचनामे आदेश देण्यात आल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र नुकसान होऊन दोन ते तीन दिवस उलटूनही अद्यापही पंचनामे झाले नसून पंचनामे दूरच मात्र शासनाच्या एकाही प्रतिनिधी शेतकऱ्याच्या बांधाकडे फिरकला नाही.

शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा आता …

एकीकडे पिकाला भाव नसताना हाता तोंडाशी आलेला घास फिरवला गेल्याने बळीराजासमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासह बँकेच्या कर्जाचा डोंगर हा उभा आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले असून राज्य सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा आता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

राज्यात अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग मोठ्या चिंतेत आहे. अनेक फळबागा उद्धवस्त झाल्या आहेत. काही ठिकाणी अद्याप पंचनामे झाले नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

Follow Us
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा, शिंदे, चाकणकर अन्..
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आला समोर
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला... बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
मोठी बातमी! प्रवाशांचा श्वास गुदमरला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्रेस
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर?