AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तरुण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर : शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना, कार्यप्रणाली अन् सरकारचा काय आहे उद्देश

शेतकऱ्यांना स्व:ताची (Farmer) अशी शेतकरी उत्पादक कंपनीचीही स्थापना करता येते. या माध्यमातून शेतीसाठी आवश्यक बियाणे, खते, कर्ज, विमा व सामूहीक शेती करून त्या शेती मालाला मार्केट मिळवून देणे हा उत्पादक कंपनी मागचा हेतू आहे. शेती बरोबरच इतर उद्योग आणि समूह शेती करण्याचे फायदे या माध्यमातून तरुण शेतकऱ्यास ही उत्पादक कंपनी ही प्रेरणादायी ठरणार आहे... जाणून घेऊ शेती उत्पादक कंपनीबाबत

तरुण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर : शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना, कार्यप्रणाली अन् सरकारचा काय आहे उद्देश
Farmer
| Edited By: | Updated on: Sep 21, 2021 | 2:21 PM
Share

लातूर : कृषी विभागातील (Agree Dipartment) ‘आत्मा’ अंतर्गत अशा अनेक योजना आहेत ज्याचा फायदा शेतीबरोबरच शेतीशी निगडीत इतर उद्योगांना होत आहे. मात्र, शेतकऱ्यांचे याकडे कायम दुर्लक्ष राहिलेले आहे. शेतकऱ्यांना स्व:ताची (Farmer) अशी शेतकरी उत्पादक कंपनीचीही स्थापना करता येते. या माध्यमातून शेतीसाठी आवश्यक बियाणे, खते, कर्ज, विमा व सामूहीक शेती करून त्या शेती मालाला मार्केट मिळवून देणे हा उत्पादक कंपनी मागचा हेतू आहे. शेती बरोबरच इतर उद्योग आणि समूह शेती करण्याचे फायदे या माध्यमातून तरुण शेतकऱ्यास ही उत्पादक कंपनी ही प्रेरणादायी ठरणार आहे… जाणून घेऊ शेती उत्पादक कंपनीबाबत

सन 2011-12 पासून शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करण्यास सुरवात झालेली आहे. कृषी विभाग तसेच शेतकऱ्यांनी स्व:ताहून अशा कंपन्यांची स्थापना ही केलेली आहे. राज्यात 3081 कंपन्यांची नोंद झालेली आहे. यापैकी 2214 ह्या कंपन्या स्व:ता शेतकऱ्यांनी स्थापीत केलेल्या आहेत. या कंपनीची नोंद ही मिनीस्टर ऑफ कोर्परेट अफेअर्स यांच्याकडे होते. याकरीता कंपनीतील 10 सदस्य हे शेतकरीच असणे आवश्यक आहे. ज्याचा लाभ शेतीशी निगडीत व्यवसाय वाढवण्यासाठी होणार आहे.

कशी करायचे कंपनीचे रजिस्ट्रेशन

एका कंपनीची स्थापना करण्यासाठी कमीत-कमी 10 शेतकरी असणे आवश्यक आहे. याशिवाय दोन वेगवेगळ्या कंपन्याही एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करु शकतात. याकरीता ठरवून दिलेल्या कागदपत्रांची पुर्तता करणे आवश्यक आहे. कंपनीचे रजिस्ट्रेशन संधी लेखापाल, कंपनी सेक्रेटरी कींवा वकीलामार्फत करता येणार आहे. शेतकरी उत्पादक कंपनीत महिला शेतकऱ्याचा सहभाग असल्यास योजनांचा लाभ अधिक प्रमाणात घेता येणार आहे. कंपनी स्थापनेचा प्रस्ताव संबंधित सी.ए. संधी लेखापाल यांच्यामार्फत मिनीस्टर ऑफ कोर्परेट अफेअर्स यांच्याकडे वर्ग होतात आणि त्यानंतर कंपनी स्थापन करण्याची म्हणजेच सर्टिफिकेट ऑफ इनकॅार्पेरेशन चे परवानगी पत्र हे आठ दिवसामध्ये दिले जाते. संबंधित माहीती कृषी अधिकारी जुबेर पठान यांनी दिली असून ते बीड येथील कृषी विभागाच्या आत्मा विभागात कार्यरत आहेत.

सदस्य म्हणून 10 शेतकरी आणि कंपनी स्थापन करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे,

1 पॅन कार्ड 2 आधार 3 मतदान ओळखपत्र, 4 ड्राइविंग लायसन्स 4 बँक स्टेटमेंट किंवा बँक पासबुक 5 कंपनीच्या डायरेक्टरचे लाईट बिल 6 10 सभासद त्यापैकी 5 डायरेक्टर 7 10 शेतकऱ्यांचे पासपोर्ट आकाराचे फोटो व मोबाइल नंबर (Beneficial for young farmers: What is the purpose of setting up, functioning and government of farmer producer company)

इतर बातम्या :

Karuna Sharma | करुणा शर्मा यांना अखेर जामीन मंजूर, तब्बल 16 दिवसांनी तुरुंगाबाहेर

राज्यपाल म्हणाले, उद्धवजी कायदा सुव्यवस्था बिघडली, अधिवेशन बोलवा, मुख्यमंत्र्यांचं जशास तसं उत्तर, मोदी-शाहांकडे बोट

कोण आहेत वैभव खेडेकर ज्यांच्याविरोधात रामदास कदम 100 कोटीचा मानहानीचा दावा करण्याची घोषणा करतायत?

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.