AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोबीला एक रुपया किलो भावही नाही, हताश शेतकऱ्याने उभ्या पिकावर ट्रॅक्टर चालवला

समरस्तीपुरच्या शेतकऱ्याने पत्ता कोबीच्या पिकाला रास्त भाव न मिळाल्याने हताश होवून हातात आलेल्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर चालवला.

कोबीला एक रुपया किलो भावही नाही, हताश शेतकऱ्याने उभ्या पिकावर ट्रॅक्टर चालवला
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Dec 15, 2020 | 1:22 PM
Share

पाटणा : देशात सध्या ननीव शेतकरी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे (Farmer Drove A Tractor On Cauliflower Crop). यादरम्यान बिहारच्या समस्तीपूर येथून एक निराशाजनक बातमी पुढे आली आहे. येथील शेतकऱ्याने पत्ता कोबीच्या पिकाला रास्त भाव न मिळाल्याने हताश होवून हातात आलेल्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर चालवला. ही बातमी हवेसारखी पसरली आणि शेतकरी किती हतबल झाला आहे याची चर्चा सर्वत्र होवू लागली. समस्तीपूर जिल्ह्यातील मुक्तापूरचे शेतकरी ओम प्रकाश यादव यांच्यामते कोबीच्या शेतीत फायदा नाही तर नुकसान होत आहे (Farmer Drove A Tractor On Cauliflower Crop).

पहिले कोबीच्या पिकाला मजुरांकडून कापून घ्यावं लागतं, त्यानंतर पोत्यात त्यांना भरावं लागतं. त्यानंतर ठेल्यावरुन नेवून ही कोबी बाजारात पोहोचवावी लागते. पण, बाजारात या कोबीला एक रुपया प्रतीकिलो भावातही कोणी विकत घ्यायला तयार नाही. त्यामुळे नाईलाजाने आपल्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर चालवला, अशी माहिती ओम प्रकाश यादव यांनी दिली. त्यांच्यामते, कोबीच्या शेतीसाठी चार हजार रुपये प्रती कट्टा येत आहे. पण बाजारात त्याला बाजारात एक रुपये किलोही भाव मिळत नाही.

त्यामुळे नाराज आणि हताश झालेल्या शेतकऱ्याने आपल्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर चालवला. पीडित शेतकऱ्याने सांगितलं की, असं दुसऱ्यांदा झालं आहे की त्याचं पिक वाया गेलं आहे. यापूर्वीही त्याच्या पिकाला कोणीही खरेदीदार मिळाला नाही. त्यामुळे आता ते त्यांच्या शेतात ते गहूची लागवड करणार आहेत. सरकारकडून त्यांना एका रुपयाचीही मदत मिळालेली नाही. यामुळे त्यांचा गहूही खराब झाला. त्यानंतर सरकारकडून त्यांना फक्त 90 हजारांची मदत मिळाली.

ओम प्रकाश यादव यांना कोबीच्या शेतात ट्रॅक्टर चालवताना बघून आजुबाजूचे लोक धावत आले आणि कोबी उचलून घेवून गेले. पिकाला किंमत न मिळाल्याने हा शेतकरी लोकांना त्याचं पीक लुटून नेताना बघूनही संतुष्ट आहे.

Farmer Drove A Tractor On Cauliflower Crop

संबंधित बातम्या :

हिंगोलीच्या शेतकऱ्याची कमाल; दुष्काळी पट्ट्यात पपईचे विक्रमी उत्पादन, कमावला लाखोंचा नफा

नांदेडच्या शेतकऱ्याला गावरान कारल्यातून फायदा, हळद पिकावरील कीड रोखण्यासाठी आयडियाची भन्नाट कल्पना

कृषी कायदे जुलमी स्वरुपाचे, मोदी सरकारनं ते तातडीनं रद्द करावेत, अब्दुल सत्तारांची मागणी

Follow Us
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल