AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आघाडीच्या काळात अन्नदात्यावरही अन्याय, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लोकप्रतिनिधींचे साखळी उपोषण

सबंध राज्यात सध्या कृषीपंपाच्या वाढत्या थकबाकीमुळे विद्युत पुरवठा खंडीत करण्याची प्रक्रियाच सुरु करण्यात आली आहे. पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिके बहरात असतानाच शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आतापर्यंत निसर्गाच्या अवकृपेमुळे पीक पदरात पडले नाही तर आता सरकारच्या या भूमिकेमुळे नुकसान होत आहे.

आघाडीच्या काळात अन्नदात्यावरही अन्याय, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लोकप्रतिनिधींचे साखळी उपोषण
विद्युत पुरठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी वर्धा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात आले आहे.
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Feb 14, 2022 | 2:15 PM
Share

वर्धा : सबंध राज्यात सध्या (Agricultural Pump) कृषीपंपाच्या वाढत्या थकबाकीमुळे विद्युत पुरवठा खंडीत करण्याची प्रक्रियाच सुरु करण्यात आली आहे. पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिके बहरात असतानाच शेतकऱ्यांचा (Power supply interrupted) विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय (State Government) सरकारने घेतला आहे. आतापर्यंत निसर्गाच्या अवकृपेमुळे पीक पदरात पडले नाही तर आता सरकारच्या या भूमिकेमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे वर्ध्याच्या हिंगणघाट विधानसभा मतदार संघात जी कारवाई आहे ती थांबवण्यात यावी या मागणीसाठी आ. समीर कुणावर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे. विशेष म्हणजे या उपोषणामध्ये हिंगणघाट मतदार संघातील 40 गावच्या सरपंचांनीही सहभाग नोंदवलेला आहे. उपोषणातून वर्ध्याला मिळणार असलेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाच्या नुकसान भरपाईचे 178 कोटी आघाडी सरकारने थकवीले असल्याचा आरोप कुणावार यांनी केला आहे. शेतकऱ्यांचे अन्न खायचे आणि त्यांचे वीज कनेक्शन कापायचे हा आघाडी सरकारचा दुटप्पीपणा असल्याची टीका यावेळी करण्यात आली.

काय आहेत मागण्या ?

या साखळी उपोषणात शेतकऱ्यांची वीज जोडणी पूर्ववत करून द्यावी, वीज कनेक्शन कापणे थांबवावे, यापूर्वी 2020-21 मध्ये अतिवृष्टीमुळे झालेले पिकाची नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची 178 कोटी रुपयांची थकलेली रक्कम लवकरात लवकर वर्धा जिल्ह्याला द्यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असून या आंदोलनात भाजपचे जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि नगराध्यक्ष देखील सहभागी झाले हाते.

रब्बी हंगामातील पिकांचे नुकासान

वातावरण निवाळल्याने रब्बी हंगामातील पिके जोमात आहेत. शिवाय गेल्या काही दिवसांपासून उन्हामध्ये वाढ होत असल्यााने पिकांना पाणी देणेही गरजेचे झाले आहे. असे असतानाच वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई ही शेतकऱ्यांवर अन्याय करणारीच आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या हीतासाठी सरकार कटीबध्द असल्याचे सांगितले जात असून दुसरीकडे असा अन्याय करुन हे सरकार दुटप्पीपणाची भूमिका घेत असल्याचा आरोप या उपोषणादरम्यान आ. समीर कुणावर यांनी केला आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या प्रश्नांची खरी जाण ही सरपंचांनाच असल्याने या साखळी उपोषणात परिसरातील 40 गावचे सरपंच सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या :

घोषणाच नाही तर अंमलबजावणीही, लातूर जिल्हा बॅंकेचा एक निर्णय अन् शेतीचा कायापालट, वाचा सविस्तर..!

ऊस तोडणी मजुरांच्या आरोग्य तपासणीचा ‘इंदापूर पॅटर्न’ ; 5 हजार मजुरांची तपासणी

शेतकऱ्याचा नाद खुळा : वऱ्हाड थेट बैलगाडीतून लग्नस्थळी, नेमकं काय कारण?

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या