AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आघाडीच्या काळात अन्नदात्यावरही अन्याय, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लोकप्रतिनिधींचे साखळी उपोषण

सबंध राज्यात सध्या कृषीपंपाच्या वाढत्या थकबाकीमुळे विद्युत पुरवठा खंडीत करण्याची प्रक्रियाच सुरु करण्यात आली आहे. पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिके बहरात असतानाच शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आतापर्यंत निसर्गाच्या अवकृपेमुळे पीक पदरात पडले नाही तर आता सरकारच्या या भूमिकेमुळे नुकसान होत आहे.

आघाडीच्या काळात अन्नदात्यावरही अन्याय, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लोकप्रतिनिधींचे साखळी उपोषण
विद्युत पुरठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी वर्धा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात आले आहे.
| Edited By: | Updated on: Feb 14, 2022 | 2:15 PM
Share

वर्धा : सबंध राज्यात सध्या (Agricultural Pump) कृषीपंपाच्या वाढत्या थकबाकीमुळे विद्युत पुरवठा खंडीत करण्याची प्रक्रियाच सुरु करण्यात आली आहे. पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिके बहरात असतानाच शेतकऱ्यांचा (Power supply interrupted) विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय (State Government) सरकारने घेतला आहे. आतापर्यंत निसर्गाच्या अवकृपेमुळे पीक पदरात पडले नाही तर आता सरकारच्या या भूमिकेमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे वर्ध्याच्या हिंगणघाट विधानसभा मतदार संघात जी कारवाई आहे ती थांबवण्यात यावी या मागणीसाठी आ. समीर कुणावर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे. विशेष म्हणजे या उपोषणामध्ये हिंगणघाट मतदार संघातील 40 गावच्या सरपंचांनीही सहभाग नोंदवलेला आहे. उपोषणातून वर्ध्याला मिळणार असलेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाच्या नुकसान भरपाईचे 178 कोटी आघाडी सरकारने थकवीले असल्याचा आरोप कुणावार यांनी केला आहे. शेतकऱ्यांचे अन्न खायचे आणि त्यांचे वीज कनेक्शन कापायचे हा आघाडी सरकारचा दुटप्पीपणा असल्याची टीका यावेळी करण्यात आली.

काय आहेत मागण्या ?

या साखळी उपोषणात शेतकऱ्यांची वीज जोडणी पूर्ववत करून द्यावी, वीज कनेक्शन कापणे थांबवावे, यापूर्वी 2020-21 मध्ये अतिवृष्टीमुळे झालेले पिकाची नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची 178 कोटी रुपयांची थकलेली रक्कम लवकरात लवकर वर्धा जिल्ह्याला द्यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असून या आंदोलनात भाजपचे जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि नगराध्यक्ष देखील सहभागी झाले हाते.

रब्बी हंगामातील पिकांचे नुकासान

वातावरण निवाळल्याने रब्बी हंगामातील पिके जोमात आहेत. शिवाय गेल्या काही दिवसांपासून उन्हामध्ये वाढ होत असल्यााने पिकांना पाणी देणेही गरजेचे झाले आहे. असे असतानाच वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई ही शेतकऱ्यांवर अन्याय करणारीच आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या हीतासाठी सरकार कटीबध्द असल्याचे सांगितले जात असून दुसरीकडे असा अन्याय करुन हे सरकार दुटप्पीपणाची भूमिका घेत असल्याचा आरोप या उपोषणादरम्यान आ. समीर कुणावर यांनी केला आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या प्रश्नांची खरी जाण ही सरपंचांनाच असल्याने या साखळी उपोषणात परिसरातील 40 गावचे सरपंच सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या :

घोषणाच नाही तर अंमलबजावणीही, लातूर जिल्हा बॅंकेचा एक निर्णय अन् शेतीचा कायापालट, वाचा सविस्तर..!

ऊस तोडणी मजुरांच्या आरोग्य तपासणीचा ‘इंदापूर पॅटर्न’ ; 5 हजार मजुरांची तपासणी

शेतकऱ्याचा नाद खुळा : वऱ्हाड थेट बैलगाडीतून लग्नस्थळी, नेमकं काय कारण?

Follow Us
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव.
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी.
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका.
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....