AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्याचा नाद खुळा : वऱ्हाड थेट बैलगाडीतून लग्नस्थळी, नेमकं काय कारण?

अमरावती : शेतकरी राजा कधी काय करेल याचा नियम नाही. काळाच्या ओघात काहीही बदल झाले तरी बैलजोडी आणि शेतकऱ्याचं नातं हे वेगळेच आहे. सध्याच्या वाढत्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्याने वेगळाच नाद केला आहे. मुलाच्या लग्नाचे वऱ्हाड थेट बैलगाडीतून समारंभ ठिकाणी मार्गस्थ केले आहे. अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव येथील शेतकऱ्याने मुलाच्या लग्नाची वरात ही बैलगाडीतून काढली आहे. शिरजगाव ते अनकवाडी असा 10 किमीचा प्रवास करुन हे वऱ्हाड लग्न समारंभाच्या ठिकाणी पोहचले होते. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती उत्पादनात मोठी घट झाली आहे. असे असले तरी दुसरीकडे इंधनाच्या दरात वाढ होत असल्याने शेतकऱ्याने ही नामी शक्कल लढवली आहे. सध्या या वऱ्हाडाची मोठी चर्चा रंगली आहे.

| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Feb 14, 2022 | 11:44 AM
Share
ही बाब अभिमानास्पद : शेतकऱ्यांकडे काही नसले तरी आपली हक्काची बैलजोडी ही असतेच. त्याचा कायम अभिमान वाटायला हवा. आज आनंदाचा दिवस असल्याने आपल्या आनंदात बैलजोडीचाही सहभाग महत्वाचा आहे. शिवाय वाढत्या इंधन दरवाढीचा ज्वलंत प्रश्न असल्याने गावचे  वऱ्हाड बैलगाडीतून आणले असल्याचे विशालने सांगितले.

ही बाब अभिमानास्पद : शेतकऱ्यांकडे काही नसले तरी आपली हक्काची बैलजोडी ही असतेच. त्याचा कायम अभिमान वाटायला हवा. आज आनंदाचा दिवस असल्याने आपल्या आनंदात बैलजोडीचाही सहभाग महत्वाचा आहे. शिवाय वाढत्या इंधन दरवाढीचा ज्वलंत प्रश्न असल्याने गावचे वऱ्हाड बैलगाडीतून आणले असल्याचे विशालने सांगितले.

1 / 4
एकच चर्चा: 10 किमी प्रवास करुन नवरदेवासह हे वऱ्हाड लग्न मंडपी पोहचल्यानंतर या अनोख्या पध्दतीची एकच चर्चा सुरु झाली आहे. आज-काल मोठ-मोठ्या अलिशान गाड्यांमधून वरात काढली जाते पण बैलगाडीतून निघालेल्या वरातीची चर्चा अनकवाडीत रंगली होती.

एकच चर्चा: 10 किमी प्रवास करुन नवरदेवासह हे वऱ्हाड लग्न मंडपी पोहचल्यानंतर या अनोख्या पध्दतीची एकच चर्चा सुरु झाली आहे. आज-काल मोठ-मोठ्या अलिशान गाड्यांमधून वरात काढली जाते पण बैलगाडीतून निघालेल्या वरातीची चर्चा अनकवाडीत रंगली होती.

2 / 4
खर्चही टळला : लग्न म्हटलं तर, अवाढव्य खर्च सगळे करताना आपण पाहत असतो. मात्र या महागाईच्या युगात शेतकऱ्याचं घरच लग्न हे अगदी साध्या पद्धतीने होत असल्याचे दिसून येते. सध्या या अनोख्या वरातीची चर्चा संपूर्ण अमरावती होत आहे इंधन दरवाढीवरून या शेतकऱ्याच्या मुलाने नामी उपाय शोधला आहे.

खर्चही टळला : लग्न म्हटलं तर, अवाढव्य खर्च सगळे करताना आपण पाहत असतो. मात्र या महागाईच्या युगात शेतकऱ्याचं घरच लग्न हे अगदी साध्या पद्धतीने होत असल्याचे दिसून येते. सध्या या अनोख्या वरातीची चर्चा संपूर्ण अमरावती होत आहे इंधन दरवाढीवरून या शेतकऱ्याच्या मुलाने नामी उपाय शोधला आहे.

3 / 4
बैलगाडीतून 10 किमीचा प्रवास: वाढत्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी शिरजगाव येथील विशाल कांबळे यांनी थेट बैलगाडीतून वऱ्हाड लग्न स्थळी मार्गस्थ केले होते. शिरजगाव ते अनकवाडी हा 10 किमीचा प्रवास बैलगाडी केल्याने हे वऱ्हाड अनेकांचे लक्ष वेधून घेत होते.

बैलगाडीतून 10 किमीचा प्रवास: वाढत्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी शिरजगाव येथील विशाल कांबळे यांनी थेट बैलगाडीतून वऱ्हाड लग्न स्थळी मार्गस्थ केले होते. शिरजगाव ते अनकवाडी हा 10 किमीचा प्रवास बैलगाडी केल्याने हे वऱ्हाड अनेकांचे लक्ष वेधून घेत होते.

4 / 4
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली