शेतकऱ्याचा नाद खुळा : वऱ्हाड थेट बैलगाडीतून लग्नस्थळी, नेमकं काय कारण?
अमरावती : शेतकरी राजा कधी काय करेल याचा नियम नाही. काळाच्या ओघात काहीही बदल झाले तरी बैलजोडी आणि शेतकऱ्याचं नातं हे वेगळेच आहे. सध्याच्या वाढत्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्याने वेगळाच नाद केला आहे. मुलाच्या लग्नाचे वऱ्हाड थेट बैलगाडीतून समारंभ ठिकाणी मार्गस्थ केले आहे. अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव येथील शेतकऱ्याने मुलाच्या लग्नाची वरात ही बैलगाडीतून काढली आहे. शिरजगाव ते अनकवाडी असा 10 किमीचा प्रवास करुन हे वऱ्हाड लग्न समारंभाच्या ठिकाणी पोहचले होते. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती उत्पादनात मोठी घट झाली आहे. असे असले तरी दुसरीकडे इंधनाच्या दरात वाढ होत असल्याने शेतकऱ्याने ही नामी शक्कल लढवली आहे. सध्या या वऱ्हाडाची मोठी चर्चा रंगली आहे.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
Follow Us
एक किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी किती पावले चालावी लागतात ?
रात्री झोपण्याच्या आधी चेहरा धुणे चांगले असते ?
सर्व टी 20I वर्ल्ड कप खेळणाऱ्या 7 महिला खेळाडू, जाणून घ्या
Test Cricket : एकूण किती पंचांना 100 कसोटी सामन्यांत अंपायरिंगचा अनुभव? जाणून घ्या
हाय बल्ड शुगरच्या रुग्णांनी कोणते पदार्थ खाऊ नयेत ?
High Cholesterol ची असतात ही 5 लक्षणे, व्हा वेळीच सावध
