AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सहनही होईना आणि सांगताही येईना, पूरग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत

महाराष्ट्रात मागच्या महिन्यात मुसळधार पाऊस झाला आहे, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसानं झालं आहे. पूरग्रस्त शेतकरी सरकारकडून मदतीच्या प्रतिक्षेत आहे.

सहनही होईना आणि सांगताही येईना, पूरग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत
buldhana (3)Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 12, 2023 | 10:05 AM
Share

गणेश सोळंकी, बुलढाणा : ढगफुटीमुळे पिकाचे नुकसान (Crop destroyed) झालेल्या शेतकऱ्यांना तसेच बेघर झालेल्यांना आर्थिक मदत द्या अशी मागणी आता शेतकरी करु लागले आहेत. पूरग्रस्त भागातील युवकांची मागणी मान्य न केल्यास त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. देशात जून महिन्यात पावसाने पाठ फिरवली होती. त्यानंतर जुलै महिन्यात मुसळधार पाऊस (heavy rain update) झाला. ज्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. तिथं पूरस्थिती निर्माण झाली होती. बुलढाणा (buldhana news in marathi) जिल्ह्यात सुध्दा मागच्या महिन्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना मदत मिळावी म्हणून युवकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.

पूरग्रस्त भागातील युवकांनी सांगितली व्यथा

जुलै महिन्यात जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात ढगफुटी सदृष्य स्थिती झाली होती. त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं. नदीकाठच्या घरांमध्ये पाणी प्यायला ग्लास सुद्धा राहिला नसल्याची खंत युवक सांगत आहेत. काही लोकांची दुकाने, जनावरे पूरातून वाहून गेल्याने खुप आर्थिक नुकसान झाल्याची माहिती तरुण सांगत आहेत.

बुलढाणा जिल्ह्यात शेतीचे ही मोठे नुकसान झाले आहे. शेतीचे अतोनात नुकसान झाले असून नदीकाठच्या जमिनी शेती पिकांसह खरडून गेल्या आहेत. भीषण स्थिती असताना सुध्दा सरकारने आतापर्यंत या नुकसान ग्रस्त भागातील लोकांना कसल्याची प्रकारची आर्थिक मदत केलेली नाही.

सध्या काही भागातील शेतकऱ्यांनी, गरिबांनी जगावं की मरावं हा प्रश्न उपस्थित केला आहे. मागच्या महिन्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. २० दिवसांचा कालावधी उलटून सुद्धा आर्थिक मदत मिळत नसेल तर आम्ही लोकांनी पाहायचं कोणाकडे असा प्रश्न युवकांनी उपस्थित केला आहे. परिसरातील काही युवकांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मागण्याचं पत्र दिलं आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Follow Us
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक.
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख...
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख....
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे....
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार.
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक..
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक...