AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sugarcane Sludge : अखेर 7 महिन्यानंतर ऊस गाळप हंगाम समाप्त, काय राहिली हंगामाची वैशिष्ट्ये?

अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा अचानक वाढलेले ऊसाचे क्षेत्र आणि साखर कारखान्याचे बिघडलेले नियोजन यामुळेच झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप केले आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यात कधी नव्हे ऊसाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे हंगामाच्या सुरवातीपासून कारखाना प्रशासनाला त्याचे नियोजन न जमल्याने अतिरिक्त उसाचा प्रश्न हा मराठवाड्यातच अधिकचा होता.

Sugarcane Sludge : अखेर 7 महिन्यानंतर ऊस गाळप हंगाम समाप्त, काय राहिली हंगामाची वैशिष्ट्ये?
साखर कारखाना
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jun 15, 2022 | 1:10 PM
Share

पुणे : यंदाचा (Sugarcane Sludge) ऊस गाळप हंगाम वेगवगळ्या अंगाने चर्चेत राहिलेला आहे. प्रथमच ऊसाचे गाळप हे सलग 7 महिने सुरु राहिले असून (Sugar production) साखर उत्पादनात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशाला देखील मागे टाकले आहे. यंदाच्या हंगामात राज्यातील 200 पैकी 198 (Sugar Factory) साखर कारखान्याची धुराडी ही बंद झाली आहे. हंगामात विक्रमी ऊसाचे गाळप झाले असले तरी मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न हा कायम राहिला आहे. राज्यातील साखर कारखान्यांनी 1 हजार 320 लाख टन ऊसाचे गाळप केल्याचे साखर आयुक्त कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले आहे. तर यामधून 137 लाख 27 हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. सहकार उद्योगाला चालना देणारा यंदाचा हंगाम राहिला असून ऊसच सर्वात मोठे नगदी पीक असल्याचे सिध्द झाले आहे. राज्यात केवळ 2 साखर कारखाने सध्या सुरु आहेत.

उर्वरित उसासाठी 2 साखर कारखाने

ऊसाच्या गाळपात आणि साखरेच्या उत्पादनात पश्चिम महाराष्ट्राने बाजी मारली आहे. हंगामाच्या सुरवातीपासून केलेले नियोजन आणि गाळप याचा ताळमेळ लागल्याने शेतकऱ्यांचे नुकसान तर टळलेच आहे पण या विभागातील साखर कारखान्यांनी मराठवाड्यील गाळप व्हावे यासाठी भूमिका घेतली होती. आता हंगाम संपल्यात जमा असला तरी उर्वरित शिल्लक उसासाठी ता.भोर येथील अनंतनगरातील राजगड सहकारी साखर कारखाना, मुक्ताईनगरातील संत मुक्ताईनगर शुगर्स आणि औरंगाबाद विभागातील एक साखर कारखाना सुरु आहे. शिवाय उर्वरित सर्व ऊसाचे गाळप होईपर्यंत हे कारखाने सुरु राहणार आहेत.

अधकिचे गाळप करुनही ऊस शिल्लक

अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा अचानक वाढलेले ऊसाचे क्षेत्र आणि साखर कारखान्याचे बिघडलेले नियोजन यामुळेच झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप केले आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यात कधी नव्हे ऊसाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे हंगामाच्या सुरवातीपासून कारखाना प्रशासनाला त्याचे नियोजन न जमल्याने अतिरिक्त उसाचा प्रश्न हा मराठवाड्यातच अधिकचा होता. गाळपाविना ऊस शिल्लक नसल्याचे सांगितले जात असले तरी मराठवाड्यात 1 कारखाना हा सुरु आहे.

विक्रमी गाळप अन् साखरेचे उत्पादनही

राज्यातील 200 साखर कारखान्यांची धुराडी जवळपास गेल्या 7 महिन्यापासून सुरु होती. शिवाय पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता यामुळे उताराही चांगला मिळाला होता. त्यामुळेच राज्यात 1320 लाख टन ऊसाचे गाळप झाले आहे. गाळपाबरोबर साखरेच्या उत्पादनात विक्रमी वाढ करुन जागतिक पातळीवर राज्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. 137.27 लाख टन साखरेचे उत्पादन एकट्या महाराष्ट्रातून झाले असून यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी आणि सहकारसाठी योग्य दिशा देणारे राहणार असल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे.

Follow Us
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका! विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका! विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात मोठी खळबळ
शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
Sachin Ahir | मी गेल्याशिवाय कळणार नाही...शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदेंसह ओमराजेदेखील... राजकारणातील हालचाली वाढल्या
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
New Rules | आजपासून लागू झाले 11 मोठे नियम! बँक, ITR, पासपोर्ट, HSRP ते LPG... सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट....
सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! अहिरांवर राऊतांचा संताप
Sanjay Raut Full Press | सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! विश्वासाला तडा देणाऱ्यांना जनता ओळखते; अहिरांवर राऊतांचा संताप
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील कराराचा भारतीयांना थेट फायदा; आता पेट्रोल...
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा धिंगाणा; मद्यधुंद अवस्थेत... पुढे भयंकर घडलं?
शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राऊतांचा अहिरांवर घणाघात
Sanjay Raut | शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राजकीय प्रवास कलंकित, राऊतांचा सचिन अहिरांवर घणाघात
नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात
Nashik | हरी मुखे म्हणा! नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत