पीक पध्दतीमध्ये होतोय बदल, उत्तर भारतामधील राजमा मराठवाड्यात, अशी करा लागवड अन् भरघोस उत्पादन

रब्बी हंगाम म्हणले की, ज्वारी, गहू हरभरा हीच पिके समोर येतात. मराठवाड्यातील वातावरणामुळे या पारंपारिक पीकावरच शेतकऱ्यांची मदार असते. मात्र, काळाच्या ओघात पीकपध्दतीमध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांनीही बदल स्वीकारलेला आहे. केवळ नगदी पीकेच नाही तर आता उत्तर भारतामध्ये घेतले जाणारे राजम्याचे पिकही आता मराठवाड्यात वाढत आहे.

पीक पध्दतीमध्ये होतोय बदल, उत्तर भारतामधील राजमा मराठवाड्यात, अशी करा लागवड अन् भरघोस उत्पादन
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 8:09 AM

लातूर : (Rabi season) रब्बी हंगाम म्हणले की, ज्वारी, गहू हरभरा हीच पिके समोर येतात. (Marathwada) मराठवाड्यातील वातावरणामुळे या पारंपारिक पीकावरच शेतकऱ्यांची मदार असते. मात्र, काळाच्या ओघात पीकपध्दतीमध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांनीही बदल स्वीकारलेला आहे. केवळ (Cash Crop) नगदी पीकेच नाही तर आता उत्तर भारतामध्ये घेतले जाणारे राजम्याचे पिकही आता मराठवाड्यात वाढत आहे. शेतकऱ्यांसाठी हे पीक नवे असले तरी त्याची लागवड पध्दत आणि जोपासना ही महत्वाची आहे. राजमा हे थंड हवामानात येणारे पीक आहे. विदर्भातील हवामान या पिकास अत्यंत पोषक आहे. हे पिक साधारण 75 ते 85 दिवसात तयार होते. त्यामुळे पाण्याची मुबलक प्रमाणात व्यवस्था असल्यास हिवाळ्यामध्ये राजमा आणि उन्हाळ्यामध्ये भुईमुग या पिकास अवलंब करता येतो.

जमिनीची निवड व मशागत

राजमा या पिकास मध्यम ते भारी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिनी सर्वोत्तम ठरते. चोपण अथवा पाणी साचणारी जमीन या पिकाकरीत निवडू नये. खरीप हंगामातील पिकांची कापणी झाल्याबरोबर राजमा या पिकाचे जास्त उत्पादन मिळण्याकरिता जमीन लोखंडी नागराने किंवा ट्रॅक्टरद्वारे नांगरून नंतर वखराच्या दोन- तीन पाळ्या देवून जमीन भुसभुशीत करावी.

बिजप्रक्रिया अन् पेरणी : पेरणीपूर्वी खते जिवाणू संवर्धनाचा तसेच ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकांची 4 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. राजमा या पिकाची पेरणी ऑक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यात केल्यास चांगले उत्पन्न मिळते. पेरणी त्या अगोदर व ऑक्टोबरच्या महिन्यानंतर केल्यास उत्पादनात घट होते.

योग्य जातीची निवड

वेळेवर म्हणजे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी करिता व्हीएल 63, एचयुआर 15, पीडिआर 14, एचयुआर 137 या जातीची निवड करावी. उशीरा पेरणी करिता एचयुआर 87 व एचयुआर 137 ह्या जातीची लागवड करावी.

खताच्या मात्रा आणि पाण्याचे नियोजन

राजमा या पिकाचे भरपूर उत्पादन करिता पेरणीच्या वेळेस 90 किलो नत्र आणि 60 किलो स्फुरद या प्रमाणात रासायनिक खताच्या मात्रा दयाव्यात . पिक फुलोऱ्यात असताना 2 टक्के युरीयाची फवारणी केल्यास उत्पन्नात वाढ होते. राजमा या पिकाला साधारण 7 ते 9 पाळ्या द्यावा लागतात. पेरणी आगोदर पाणी देवून वाफसा आल्यानंतर पेरणी करावी. पेरणीनंतर पून्हा पाणी द्यावे. बियाण्यावर मातीचा कडक थर जमा झाल्यास 3 ते 4 दिवसांन पाणी द्यावे यामुळे बियाणे उगवण्यास मदत होते. नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे 10 ते 15 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या घालाव्या लागणार आहे.

पेरणी

या पिकाची पेरणी वाणानुसार करावी एचयुआर 15 आणि पीडीआर 14 हे वाण असल्यास दोन ओळीतील अंतर 30 से.मी. त्याचप्रमाणे दोन रोपातील अंतर 10 से.मी. ठेवावे. आणि व्हीएल 63 आणि एचयुआर 137 या वाणाकरीता दोन ओळीतील अंतर 45 से.मी. तर दोन झाडामधील अंतर 10 सेमी. ठेवावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

दुष्काळात तेरावा : डाळिंबाचे उत्पादन निम्म्याने घटले तरीही दर गडगडले, काय आहेत नेमकी कारणं?

आता खासगी बाजार समित्यांच्या उभारणीवरुन शेतकरी संघटना आक्रमक, काय आहे केंद्र सरकारला लिहलेल्या पत्रात?

Positive News | आवक वाढूनही सोयाबीनचे दर स्थिरावले, तरीही शेतकऱ्यांनी…

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.