AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cultivation of Ginger : आले लागवडीचे मुहूर्तही हुकले, शेतकऱ्यांवर कशामुळे ओढावले संकट ?

सातारा जिल्ह्यात सुपिक शेतजमिनी आणि मुबलक पाणी यामुळे पीक पध्दतीमध्ये बदल हा ठरलेलाच आहे. या भागात उसानंतर आले हेच सर्वात मोठे नगदी पीक आहे. मात्र, गेल्या 3 ते 4 वर्षापासून आल्याच्या दरात तर घसरण झालीच आहे पण उद्भवलेल्या परस्थितीमुळे यंदा लागवड क्षेत्रातही घट झाली आहे. सध्या आल्याला 10 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर आहे. कोरोनानंतर का होईना आल्याला चांगला भाव मिळेल या आशेने गतवर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली गेली होती.

Cultivation of Ginger : आले लागवडीचे मुहूर्तही हुकले, शेतकऱ्यांवर कशामुळे ओढावले संकट ?
वातावरणातील बदलामुळे यंदा सातारा जिल्ह्यामध्ये आले लागवड महिन्याभराने लांबणीवर पडलेली आहे.
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: May 05, 2022 | 11:10 AM
Share

सातारा : पीक पेरणीचा आणि काढणीचा एक कालावधी ठरलेला असतो. त्या दरम्यानच पिकांची पेरणी अथवा लागण झाल्यावर अपेक्षित (production) उत्पादन मिळते. मात्र, पाण्याची कमतरता, वाढते तापमान आणि अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे यंदा (Ginger Cultivation) आले लागवडही लांबणीवर पडलेली आहे. त्यामुळे आता पावसाच्या पाण्यावरच या आले पिकाचे भवितव्य अवलंबून आहे. लागवड लांबली असली तरी त्याचा परिणाम थेट लागवड (Ginger Area) क्षेत्रावर होणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. यंदा 30 ते 40 टक्क्यांनी क्षेत्रात घट होणार आहे. उत्पादनाच्या दृष्टीने हे भरवश्याचे पीक मानले जाते पण यंदा लागवडीपूर्वीच घरघर लागली आहे.

उसानंतर सर्वात मोठे नगदी पीक

सातारा जिल्ह्यात सुपिक शेतजमिनी आणि मुबलक पाणी यामुळे पीक पध्दतीमध्ये बदल हा ठरलेलाच आहे. या भागात उसानंतर आले हेच सर्वात मोठे नगदी पीक आहे. मात्र, गेल्या 3 ते 4 वर्षापासून आल्याच्या दरात तर घसरण झालीच आहे पण उद्भवलेल्या परस्थितीमुळे यंदा लागवड क्षेत्रातही घट झाली आहे. सध्या आल्याला 10 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर आहे. कोरोनानंतर का होईना आल्याला चांगला भाव मिळेल या आशेने गतवर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली गेली होती. पण दर हे 7 हजार ते 8 हजार दरम्यानच राहिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीचा उद्देश साध्य करता आला नाही. यंदा तर उत्पादनाच घट होणार असल्याचे सांगण्यात आली आहे.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होत असते लागवड

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, सातारा, वाई, माण, खटाव व फलटण तालुक्यात आल्याचे उत्पादन घेतले जाते. या भागातील पोषक वातावरणामुळे पिकही बहरात येते. एवढेच नाहीतर आल्यामध्ये आंतरपिकही घेता येत असल्याने दिवसेंदिवस आल्याचे क्षेत्र वाढत होते. दरवर्षी अक्षय तृतीयेचे मुहूर्त साधत लागवड केली जाते. यंदा मात्र, वाढलेले तापमान, घटलेली पाणीपातळी आणि अनियमित विद्युत पुरवठा यामुळे शेतकऱ्यांना मुहूर्त साधता आलेले नाही. त्यामुळे आता पावसाळा सुरु झाल्यावरच आले याची लागवड केली जाणार आहे.

सातारा जिल्ह्यामध्ये अडीच हजार हेक्टरावर लागवड

उसानंतर आले हे नगदी पीक आहे. त्यामुळे कमी कालावधीत अधिकचे उत्पादन मिळते. गेल्या अनेक दिवसांपासून सातारा जिल्ह्यामध्ये आले पिकाची लागवड ही केली जात आहे. जिल्ह्यातील कोरेगाव, सातारा, वाई तसेच दुष्काळी भागातील माण, खटाव व फलटण या तालुक्यांमध्ये आले लागवड केली जाते. शेतकऱ्यांची आर्थिक नड भागविणारे पीक म्हणून आल्याकडे पाहिले जाते. सातारा जिल्ह्यात 2 हजार 500 हेक्टरावर लागवड केली जात आहे. यंदा मात्र, उत्पादनात आणि क्षेत्रात घट झाली आहे.

Follow Us
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; राऊतांना...
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; बड्या नेत्याचा राऊतांना इशारा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी, पहा खास क्षणाचा व्हिडीओ
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात...नेमकं प्रकरण काय?
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात... नेमकं प्रकरण काय?