AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chickpea Crop : हरभरा खरेदी केंद्राला पुन्हा ‘ब्रेक’, खुल्या बाजारपेठेतील दरांवर काय परिणाम?

खुल्या बाजारपेठेपेक्षा खऱेदी केंद्रावर हरभऱ्याला जवळपास 1 हजार रुपये अधिचा दर होता. दरातीव वाढत्या तफावतीमुळे शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राचा आधार घेण्याचे ठरवले होते. त्यामुळे हरभरा खरेदी केंद्रावरील आवक तर वाढलीच शिवाय शेतकऱ्यांनाही याचा फायदा झाला. रब्बी हंगामात हरभऱ्याचा विक्रमी पेरा झाला होता. त्यामुळे आवक वाढणार हे निश्चित असल्याने बाजारपेठेतील दर घसरणीला सुरवात झाली होती.

Chickpea Crop : हरभरा खरेदी केंद्राला पुन्हा 'ब्रेक', खुल्या बाजारपेठेतील दरांवर काय परिणाम?
हरभऱ्याच्या आयातीमध्ये मोठी घट झाली आहे.
| Updated on: Jun 05, 2022 | 3:27 PM
Share

लातूर : दोन महिन्यापासून हरभरा उत्पादकांना खरा दिलासा मिळाला तो (Chickpea Crop) हऱभऱा खरेदी केंद्राचा. हंगामाच्या सुरवातीला (MSP) हमी भाव केंद्रावर अधिकचा दर असताना देखील शेतकरी (Open Market) खुल्या बाजारात कमी दराने विक्री करीत होते. मात्र, हंगामाचा शेवट असा काय झाला आहे की खरेदी केंद्र बंद होऊन दोन दिवस उलटले तरी शेतकऱ्यांना आशा आहे की, खरेदी केंद्र होतील. पण प्रत्यक्षात गेल्या दोन महिन्यात हरभऱ्याची विक्रमी खरेदी झाल्याने नाफेडचे उद्दिष्टच साधल्याने राज्यभरातील खरेदी पुन्हा बंद झाली आहेत. 23 मार्च रोजी केंद्र बंद झाल्याने प्रचंड नाराजी पसरली होती. शेतकऱ्यांचा रेटा आणि राज्यभर भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने खरेदी केंद्र सुरु झाली होती. पण शुक्रवारी हरभऱा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगत राज्यातील हरभऱा खरेदी केंद्र पुन्हा बंद करण्यात आली आहेत.

खरेदी केंद्र बंद होताच खुल्या बाजारपेठेत परिणाम

खुल्या बाजारपेठेपेक्षा खऱेदी केंद्रावर हरभऱ्याला जवळपास 1 हजार रुपये अधिचा दर होता. दरातीव वाढत्या तफावतीमुळे शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राचा आधार घेण्याचे ठरवले होते. त्यामुळे हरभरा खरेदी केंद्रावरील आवक तर वाढलीच शिवाय शेतकऱ्यांनाही याचा फायदा झाला. रब्बी हंगामात हरभऱ्याचा विक्रमी पेरा झाला होता. त्यामुळे आवक वाढणार हे निश्चित असल्याने बाजारपेठेतील दर घसरणीला सुरवात झाली होती. आता खरेदी केंद्र बंद झाल्याने खुल्या बाजारपेठेशिवाय पर्यांयच नसल्याने पुन्हा आहे त्या दरात घट होऊ नये. कारण आता खरेदी केंद्रावरील गर्दी थेट बाजारपेठेत होणार आहे.

आठवड्याभरात दोनदा खरेदी केंद्र बंद

23 मार्च रोजी अचानक राज्यभरातील खरेदी केंद्र ही बंद झाली. याबाबत शेतकरीच काय पण केंद्र चालकही अनभिज्ञ होते. अचानक निर्णयामुळे शेतकऱ्यांची तर हेळसांड झालीच पण केंद्रावरील मालाचे करायचे काय असा सवाल होता. मात्र, शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत असतानाच पुन्हा 18 जूनपर्यंत केंद्र सुरु झाल्याचा निर्णय झाला पण आता अजून उद्दिष्टापेक्षा अधिक हरभरा खरेदी झाल्याने हा निर्णय घेतल्याचे नाफेडच्या वतीने सांगण्यात आले आहे.

दरामध्ये होणार घट

हरभरा खरेदी केंद्रावर नोंदणी आणि विक्री अशी प्रक्रिया पार पाडावी लागते. केंद्रावर हरभऱ्याला 5 हजार 230 असा दर ठरवून दिला होता. तर बाजारपेठेत 4 हजार 600 पर्यंत दर आहे. आता खरेदी केंद्र बंदच झाल्याने खरेदी केंद्रावरचा माल खुल्या बाजारपेठेमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे दरात आणखीन घट होण्याचा धोका अधिक आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.