AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Marathwada : पावसामध्ये सातत्य, सरासरीपेक्षा अधिक बरसणार वरुणराजा, काय राहणार मराठवाड्यात स्थिती?

खरीप हंगामातील पिकांमध्ये पाणी साचून राहिल्याने पिके पिवळी पडत आहेत तर पिकांची वाढही खुंटत आहे. पिकांची उगवण होताच मुसळधार पावसामध्ये सातत्य राहिलेले आहे. गेल्या 10 दिवसांपासून हीच स्थिती असल्याने पाणी साचून राहिलेले आहे. निचरा होणाऱ्या जमिनीतील पिके ही सुस्थितीमध्ये आहेत. मात्र, अशाच प्रकारे पावसामध्ये सातत्य राहिले तर पिकांचे नुकसान अटळ आहे.

Marathwada : पावसामध्ये सातत्य, सरासरीपेक्षा अधिक बरसणार वरुणराजा, काय राहणार मराठवाड्यात स्थिती?
मराठवाड्यात पावसामध्ये सातत्य राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
| Updated on: Jul 14, 2022 | 4:20 PM
Share

औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा (Monsoon) मान्सूनचे आगमन उशिराने झाले असले तरी देर आऐ..दुरुस्त आऐ..अशीच स्थिती आहे. कारण गेल्या 10 दिवसांपासून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे काही ठिकाणची पिके पाण्यात आहेत तर (Dam Water Level) धरणातील पाणीपातळीत वाढ झाली आहे. जून महिन्याची कसर गेल्या 10 दिवसांमध्ये भरुन निघाली आहे. अतिरिक्त पावसामुळे (Kharif Season) खरीप हंगामातील सोयाबीन हे पाण्यात आहे तर नुकसान भरपाईची मागणी शेतकरी आता करीत आहेत. सध्याची ही स्थिती असली 21 जुलैपर्यंत पावसामध्ये सातत्या राहणार असल्याच अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 15 ते 21 जुलै दरम्यानच्या काळात या आठही जिल्ह्यामध्ये सरासरी किंवा त्यापेक्षा अधिकचा पाऊस होणार आहे. त्यामुळे पावसाचा धोका टळला असे नाही. मराठावड्यातील जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होते आहे. गोदावरी नदीला पूर आल्याने पाण्याची आवक ही वाढली आहे. मात्र, कोकण विदर्भ आणि उत्तर महाराष्टापेक्षा मराठवाड्यात स्थिती ही नियंत्रणात आहे.

नांदेडमध्ये सर्वाधिक पाऊस

मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये अधिकचा पाऊस झाला आहे. या दोन जिल्ह्यातूनच पावसाला सुरवात झाली होती. 9 जुलैपर्यंत एकट्या नांदेड जिल्ह्यामध्ये 198 मिमी पावसाची नोंद झाली होती. हिंगोली जिल्ह्यात 123 मिमी तर परभणी जिल्ह्यामध्ये 155 मिमी पावसाची नोंद झालेली आहे. आगामी आठवड्यातही या जिल्ह्यांमध्येच वरुण राजाची कृपादृष्टी राहणार आहे. त्यामुळे आगामी 7 दिवसांमध्ये पिके तरली जाणार की नुकसान होणार हे पहावे लागणार आहे.

खरीप पिकांची वाढ खुंटली

खरीप हंगामातील पिकांमध्ये पाणी साचून राहिल्याने पिके पिवळी पडत आहेत तर पिकांची वाढही खुंटत आहे. पिकांची उगवण होताच मुसळधार पावसामध्ये सातत्य राहिलेले आहे. गेल्या 10 दिवसांपासून हीच स्थिती असल्याने पाणी साचून राहिलेले आहे. निचरा होणाऱ्या जमिनीतील पिके ही सुस्थितीमध्ये आहेत. मात्र, अशाच प्रकारे पावसामध्ये सातत्य राहिले तर पिकांचे नुकसान अटळ आहे.

शंकू गोगलगायीचा प्रादुर्भाव

खरिपातील पिकांची उगवण होताच शंकू गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढला आहे. पिकांची उगवण होताच किडीचा प्रादुर्भाव झाला तर मात्र वाढीवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे गोगलगाईला थांबण्यासाठी सुरक्षित जागा राहणार नाही. सकाळी किंवा संध्याकाळी ह्या गोगलगायी ह्या साबणाचे किंवा मिठाचे पाणी घेऊन त्यामध्ये मारुन टाकाव्यात. पिकाच्या क्षेत्रात 7 ते 8 मीटरवर वाळलेल्या गवताचे बुचाडे उभा करावेत. जेणेकरुन गोगलगायी त्याच्या आश्रयाला येतील आणि मग त्या अंडी घालण्यास एकत्र आल्यावर त्या नष्ट कराव्या लागणार आहेत. लहान शंखीसाठी मिठाची किंवा कॅल्शिअम क्लोराईडचासुध्दा वापर करता येणार आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.