AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बोंडअळीचं संकट कमी, शेतकरी पुन्हा पांढऱ्या सोन्याकडे, बळीराजाला दमदार पावसाची प्रतिक्षा

बोंडअळीचे संकट काहीसे कमी झाल्याने पुन्हा शेतकरी कापसाच्या पिकाकडे आकृष्ठ झाल्याचे दिसतंय. यंदा सोयाबीनच्या पाठोपाठ कापसाची लागवड होण्याची शक्यता दिसतेय. (Control of ballworm nanded farmers shifted back to cotton crop)

बोंडअळीचं संकट कमी, शेतकरी पुन्हा पांढऱ्या सोन्याकडे, बळीराजाला दमदार पावसाची प्रतिक्षा
बोंडअळीचे संकट काहीसे कमी झाल्याने पुन्हा शेतकरी कापसाच्या पीकाकडे आकृष्ठ झाल्याचे दिसतंय.
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: Akshay Adhav | Updated on: Jun 12, 2021 | 11:04 AM
Share

नांदेड : नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत सर्वदूर पावसाचे आगमन झाले नाही, मात्र बळीराजाची आतापासूनच लगबग सुरू झालीय. नांदेड जिल्ह्यात यंदा सोयाबीनचा पेरा सर्वाधिक असणार आहे तर त्या खालोखाल कापूस लागवडीकडे देखील शेतकरी वळलेला दिसतोय. शेत शिवारात कपाशीच्या लागवडीची धांदल दिसून येत आहे. (Control of ballworm nanded farmers shifted back to cotton crop)

मराठवाड्यातील बहुतांश भागात पूर्वी कापसाचे पीक मोठया प्रमाणात घेतलं जात असायचं. मात्र गेल्या काही वर्षात खरीप हंगामात सोयाबीनचे पेरणी क्षेत्र मोठया प्रमाणात वाढलंय. तीन वर्षांपूर्वी कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे या पांढऱ्या सोन्याकडे शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षांपासून पाठ फिरवली होती. मात्र बोंड अळी नियंत्रणात आल्याने पुन्हा शेतकरी कापसाच्या लागवडीकडे वळलाय. शेतकऱ्याला आता दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.

कापसाची धूळ पेरणी

गतवर्षी परतीच्या पावसामुळे नांदेडसह बहुतांश भागात भूजल पातळी टिकून आहे. त्यामुळे सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी कापसाची लागवड करून घेतलीय. आता या कापसाच्या पिकांचे अंकुर वाऱ्यावर डलताना दिसतायत. जमिनीत आलटून पालटून पिके घेतल्याने उत्पादनात वाढ होते, हा आजवरचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यातून यंदा कापसाचे पीक चांगले येईल अशी आशा आहे.

पेरणीसाठी घाई नको : कृषी विभाग

नांदेडसह मराठवाड्यात मान्सून अद्याप सक्रिय झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आताच पेरणीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाने केलंय. साधारणतः जमिनीत चांगली ओल झाल्यावरच खरीप हंगामातील पेरण्या कराव्यात असे आवाहन कृषी विभागाने केलं आहे. मात्र सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी कापूस लागवडीला प्राधान्य दिल्याचे चित्र दिसतंय.

सोयाबीनच्या बियाण्यांची टंचाई

खरीप हंगामात सर्वाधिक पेरणी ही सोयाबीनची होते. मात्र शेतकऱ्यांच्या पसंतीची असलेले महामंडळाच्या महाबीजची टंचाई जाणवतेय. त्यातून अनेक शेतकऱ्यांनी घरच्या सोयाबीनची उगवण क्षमता तपासून पेरणी करण्यास सुरुवात केलीय.

इंधन दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना

शेतीतील बहुतांश कामे आता यंत्राद्वारे करण्यात येतायत. सर्जा राजाच्या जोडीवर शेती आता दुर्मिळ झालीय. त्यामुळे ट्रॅक्टर आणी इतर यंत्राच्या मदतीने शेतीची कामे करावी लागतायत. त्यातच डिझेल जवळपास शंभराच्या जवळ गेलंय. त्यामुळे शेतीच्या मशागतीचा खर्च वाढल्याने बळीराजा हवालदिल झालाय.

(Control of ballworm nanded farmers shifted back to cotton crop)

हे ही वाचा :

एकाच झाडावर 22 जातीच्या आंब्याचे उत्पादन, सांगलीतील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग 

Weather Alert: मुंबई, ठाण्यासह कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 5 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

20 रुपयांनी मका पिकाची MSP वाढवून उत्पन्न दुप्पट कसं करणार? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...