AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकाच झाडावर 22 जातीच्या आंब्याचे उत्पादन, सांगलीतील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग 

काकासाहेब सावंत यांनी आयटीआयमधून डिप्लोमा केला आहे. ते पुण्यातील अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये एक दशकाहून अधिक काळ काम करत होते.

एकाच झाडावर 22 जातीच्या आंब्याचे उत्पादन, सांगलीतील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग 
sangli mango production 1
| Edited By: | Updated on: Jun 12, 2021 | 8:22 AM
Share

सांगली : सांगलीत एकाच आंब्याच्या झाडावर 22 जातीच्या आंब्याचे उत्पादन घेतल्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. सांगलीतील जत तालुक्यातील अंतराळ गावातील एका शेतकऱ्याने हा प्रयोग केला आहे. काकासाहेब सावंत असे या शेतकऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे त्यांना यात चांगलाच आर्थिक फायदा झाला आहे. (Sangli Farmer experiment successful of producing 22 varieties of mangoes on a single tree)

पुण्यातील नोकरी सोडून गाव गाठले

सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळग्रस्त भाग. याच तालुक्यातील अंतराळ गावचे काकासाहेब सावंत यांनी नोकरी सोडून गाव गाठले. त्यानंतर शेती सुरू केली. काही दिवसांनी त्यांनी शासनमान्य श्री बनशंकरी नावाने नर्सरी सुरू केली. या तालुक्यातील शेती निसर्गाच्या कृपेवर अवलंबून आहे. असे असतानाही मोठ्या हिंमतीने काकासाहेब सावंतांनी नर्सरी सुरू केली.

काकासाहेब सावंत यांनी आयटीआयमधून डिप्लोमा केला आहे. ते पुण्यातील अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये एक दशकाहून अधिक काळ काम करत होते. हे काम केल्यानंतर काकासाहेब सावंत आता एक नर्सरी चालवतात. त्यातून त्यांना वर्षाकाठी 50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. हे करत असताना सावंत यांनी 3 वर्षांच्या आंब्याच्या झाडावर एक प्रयोग केला. यात त्यांनी 22 प्रकारच्या आंब्याची लागवड केली. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयोगात हा प्रयोग चांगलाच यशस्वी झाला.

sangli mango production 1

sangli mango production 1

शेतीची दोन गटात विभागणी

सावंतांनी त्यांची शेती आंब्याची लागवड आणि बिगर आंब्याची लागवड अशा दोन गटात विभागली आहे. यात केशर या आंब्याची जातीची लागवड जवळपास 10 एकरांत केली आहे. तर उर्वरित 10 एकरांमध्ये चिकू, डाळिंब, सीताफळ, हळद इत्यादींची लागवड केली जाते. सावंतांनी सरकारच्या विविध योजनांमधून सब्सिडीचा लाभ घेत ही नर्सरी सुरू केली आहे. अनेक वर्षे सातत्याने मेहनत घेत आणि आपल्या कामाचा पाठपुरावा करत त्यांनी यश मिळवले आहे.

यंदा 4 लाख रोपांची ऑर्डर 

यानंतर आता जत तालुक्यात आंब्याच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जाते. काकासाहेब दरवर्षी आपल्या नर्सरीत केशर आंब्याची रोपे लावतात. प्रत्येक रोप 40 ते 70 रुपयांना विकले जाते. सावंत दरवर्षी जवळपास 2 लाख आंब्याची रोपे विकतात. याव्यतिरिक्त ते एक लाख सीताफळे, जांभूळ, चिकू, लिंबू इत्यांदी फळांची रोपे विकतात. सावंतांच्या नर्सरीतून रोपे घेण्यासाठी परभणी, बीड,।उस्मानाबाद, बुलढाणा, कोल्हापूर, विजापूर, बेळगाव।इत्यादी परिसरांतून लोक येतात.

यावर्षी त्यांना आश्चर्यकारकरित्या 4 लाख रोपांची ऑर्डर मिळाली आहे. मेकॅनिकची छोटीशी नोकरी करण्यापेक्षा स्वत:च व्यवसाय सुरू करा. त्यातून मोठे यश कमावता येते, यामुळे काकासाहेब सावंत यांच्या यशाची कहाणी अनेकांना प्रेरणा देऊ शकते.

पाहा व्हिडीओ :

(Sangli Farmer experiment successful of producing 22 varieties of mangoes on a single tree)

संबंधित बातम्या : 

गडचिरोली जिल्ह्यातील जांभूळ विक्रीला ऑनलाईन शुभारंभ, शेतकऱ्यांमध्ये दसपट दर मिळाल्यानं आनंदाचं वातावरण

मान्सून दाखल, महाबीज शेतकऱ्यांना बियाण्याचं वाटप कधी करणार? रासायनिक खतांचाही तुटवडा

TV9 Marathi Impact: लासलगांव बाजार समितीत 75 वर्षांची पंरपरा रद्द, अमावस्येला कांदा लिलावाला सुरुवात

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.