AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Washim : भारनियमन मुळावर, उपलब्ध पाणीसाठ्याचा उपयोग काय? शेतकऱ्यांचे पाण्यात आंदोलन

शेती व्यवसायावर अस्मानी किंवा सुल्तानी संकट हे ठरलेले आहे. यंदाच्या दोन्ही हंगामात याचा प्रत्यय आला आहे. खरीप हंगामातील पिकांचे नुकसान हे निसर्गाच्या लहरीपणामुळे तर आता रबी हंगामात महावितरणने शेतकऱ्यांना असा काय शॉक दिला आहे की, बहरात आलेले पीक पदरात पडते की नाही अशी स्थिती झाली आहे. मध्यंतरी रोहित्राचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर तोडगा निघताच आणि भारनियमन वाढले आहे. त्यामुळे रब्बीसह हंगामी पिकांचे नुकसान होत आहे.

Washim : भारनियमन मुळावर, उपलब्ध पाणीसाठ्याचा उपयोग काय? शेतकऱ्यांचे पाण्यात आंदोलन
अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकासान होत असल्याने शेतकऱ्यांनी पाण्यात उतरुन आंदोलन केले.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 18, 2022 | 11:37 AM
Share

वाशिम : शेती व्यवसायावर अस्मानी किंवा सुल्तानी संकट हे ठरलेले आहे. यंदाच्या दोन्ही हंगामात याचा प्रत्यय आला आहे. खरीप हंगामातील पिकांचे नुकसान हे निसर्गाच्या लहरीपणामुळे तर आता (Rabi Season) रबी हंगामात  (MSEB) महावितरणने शेतकऱ्यांना असा काय शॉक दिला आहे की, बहरात आलेले पीक पदरात पडते की नाही अशी स्थिती झाली आहे. मध्यंतरी रोहित्राचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर तोडगा निघताच आणि (Irregular power supply) भारनियमन वाढले आहे. त्यामुळे रब्बीसह हंगामी पिकांचे नुकसान होत आहे. भारनियमन निर्णयाचा निषेध करीत जऊळका, कुत्तरडोह, अमानवडी येथील शेतकऱ्यांनी थेट पाण्यात उतरुन आंदोलन केले आहे. प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अशाप्रकारे आंदोलन शेतकऱ्यांनी केले असून आता महावितरण काय निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे.

शेती उत्पादन घटण्याची शक्यता

रब्बी हंगामातील पिकांसाठी आतापर्यंत पोषक वातावरण होते. शिवाय पाणीसाठाही मूबलक असल्याने पिके बहरात आहेत. पण आता अंतिम टप्प्यात पिके असतानाच महावितरणने भारनियमन करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार आहे. यापूर्वी रात्री-अपरात्री विद्युत पुरवठा केला जात होत आता तर नियमित पुरवठाच नसल्याने पिकांची जोपासणा करायची कशी असा सवाल आहे.सुरळीत विद्युत पुरवठा करण्याची महावितरणकडे करुनही दुर्लक्ष केले जात होते. सबंध हंगामात महावितरणने शेतकऱ्यांच्या समस्यामध्ये वाढच केली आहे. त्यामुळे उत्पादनावर याचा परिणाम होणार आहे.

उन्हाळी हंगामातील सोयाबीनला सर्वाधिक फटका

यंदा पीक पध्दतीमध्ये बदल करुन शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा केल आहे. खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार आहे. शिवाय सोयाबीन हे पावसाळी पीक असल्याने त्याला अधिकच्या पाण्याची आवश्यकता असते. पण आता शेंग भरण्याच्या अवस्थेतच वेळेत पाणी मिळत नसल्याने पिकांनी माना टाकल्या आहेत. उन्हाळी सोयाबीनचा केवळ उत्पादन म्हणून नाही तर बियाणांसाठीही उपयोगी पडणार आहे. पण महावितरणच्या या भूमिकेमुळे पीक पदराच पडते की नाही अशी स्थिती आहे.

शेतकऱ्यांसह स्वाभिमानीचे पदाधिकारी पाण्यात

महाविरणच्या निर्णयाचा निषेध कऱण्यासाठी शेतकऱ्यांनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट पाण्यात उतरुन आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी नाही तर शेतकरी अडचणीत आणण्यासाठीच सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून जोपर्यंत विद्युत पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन केले जाणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दामू अण्णा इंगोले यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Hapus Mango : कोकणातील हापूसचा आता राज्यभर गोडवा, कलमांसाठी कृषी विभागही लागला कामाला

Agricultural Exhibition: दीड टन वजनाच्या ‘गजेंद्र’ रेड्याचा रुबाबच वेगळा,कोट्यावधीची बोली अन् मालकाची ना..

Onion Market: बुडत्याला काडीचा आधार, ‘नाफेड’ ची खरेदी अन् शेतकऱ्यांना फायदा, कांद्याच्या मुख्य मार्केटमध्ये चाललयं काय?

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.