AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Marathwada : पावसाचा जोर कमी, नुकसानीच्या खुणा मात्र कायम, शेतकऱ्यांचे आता सरकारलाच साकडे..!

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे केवळ खरिपातील तूर,मूग, उडीद, सोयाबीन आणि कापसाचेच नुकसान झाले असे नाही तर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये हळदीचे उत्पादन क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे. लागवड होताच पाणी साचून राहिल्याने हळद पीक सडले आहे. तीच अवस्था ऊसाचीही झाली त्यामुळे अधिकच्या पावसामुळे खरिपातील पिकांचेच उत्पादन घटणार असे नाहीतर ऊस आणि हळदीवरही त्याचा परिणाम होणार आहे.

Marathwada : पावसाचा जोर कमी, नुकसानीच्या खुणा मात्र कायम, शेतकऱ्यांचे आता सरकारलाच साकडे..!
मराठवाड्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी पिकांमध्ये पाणी साठलेले आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jul 16, 2022 | 4:19 PM
Share

नांदेड :  (Marathwada) मराठवाडा विभागात 1 जुलैपासून सुरु असलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून उसंत घेतली आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी त्याने (Crop Damage) नुकसानीच्या खुणा कायम ठेवल्या आहेत. नांदेडसह हिंगोली, परभणी या जिल्ह्यामध्ये केवळ पिकांचेच नुकसान झाले असे नाही तर शेतजमिनही खरडून गेली आहे. (Kharif Season) खरीप हंगामातील पिकांबरोबर ऊस, हळद आशा बारमाही असणाऱ्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. शेतीला तळ्याचे स्वरुप आल्याने पिके जागेवर सडली आहेत. विशेष म्हणजे दुबार पेरणी केल्यानंतर पावसाने हा कहर केला आहे. त्यामुळे आता तिसऱ्यांदा पेरणी करण्याची शेतकऱ्यांची परस्थिती नाही. त्यामुळे सरकारनेच आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.

ऊस, हळद मुख्य पिकांनाही फटका

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे केवळ खरिपातील तूर,मूग, उडीद, सोयाबीन आणि कापसाचेच नुकसान झाले असे नाही तर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये हळदीचे उत्पादन क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे. लागवड होताच पाणी साचून राहिल्याने हळद पीक सडले आहे. तीच अवस्था ऊसाचीही झाली त्यामुळे अधिकच्या पावसामुळे खरिपातील पिकांचेच उत्पादन घटणार असे नाहीतर ऊस आणि हळदीवरही त्याचा परिणाम होणार आहे. अतिवृष्टीनंतर जमिनीत अजून मोठ्या प्रमाणात ओलावा टिकून असल्याने दुबार पेरणी देखील शक्य नाही.

अर्धापुरी केळीला फटका

नांदेडमध्ये सलग झालेल्या चार दिवसाच्या अतिवृष्टीमुळे प्रसिद्ध असलेल्या अर्धापुरच्या केळी फळबागांना ही मोठा फटका बसलाय. केळीच्या बागात पाणी साचून राहिल्याने बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढलाय. याचे वेळीच व्यवस्थापन केले नाही तर केळी च्या बागांवर पुन्हा करपा रोग पसरू शकतो असे कृषीतज्ञांचे मत आहे. त्यामुळे केळीच्या बागा टिकवण्यासाठी शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे.

भाजीपाल्याच्या दरावरही परिणाम

अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे केवळ पिकांचेच नुकसानच नाहीतर भाजीपाल्याच्या दरावरही परिणाम झाला आहे. उत्पादनात घट आणि वाहतूकीला अडथळा होत असल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने भाजीपाल्याचे दर हे वाढत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात अशीच स्थिती असते पण यंदा अधिकचा परिणाम हा दरावर झालेला आहे. शिवाय खरिपात लागवड केला जाणाऱ्या भाजीपाल्याची लागवडही पावसामुळे लांबणीवर पडली आहे. त्यामुळे भविष्यात भाजीपाल्याचे दर हे चढेच राहतील असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.