AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur Market: अवकाळीनं उत्पादन घटलं मात्र, वाढत्या उन्हानं लिंबाचा Market वाढलं

यंदाच्या वर्षात शेती व्यवसयावर सर्वाधिक प्रभाव राहिला आहे तो निसर्गाचा. यामुळे नुकसानच अधिक झाले असून अवकळी पावसाचा परिणाम सर्वच पिकांवर झालेला आहे. हंगामी पिकांचीही यामधून सुटका झालेली नाही. अवकाळीचा असा प्रतिकूल परिणाम असला तरी वाढत्या उन्हामुळे कलिंगड, लिंबू या पिकांना विक्रमी दर मिळत आहे. सध्या उन्हाचा पारा 40 अंश सेल्सिअसपर्यंत आहे.

Solapur Market: अवकाळीनं उत्पादन घटलं मात्र, वाढत्या उन्हानं लिंबाचा Market वाढलं
यंदा वाढत्या मागणीमुळे लिंबाच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Apr 06, 2022 | 9:24 AM
Share

सोलापूर : यंदाच्या वर्षात शेती व्यवसयावर सर्वाधिक प्रभाव राहिला आहे तो निसर्गाचा. यामुळे नुकसानच अधिक झाले असून (Unseasonal Rain) अवकळी पावसाचा परिणाम सर्वच पिकांवर झालेला आहे. हंगामी पिकांचीही यामधून सुटका झालेली नाही. अवकाळीचा असा प्रतिकूल परिणाम असला तरी वाढत्या उन्हामुळे कलिंगड, (Lemon) लिंबू या पिकांना विक्रमी दर मिळत आहे. सध्या उन्हाचा पारा 40 अंश सेल्सिअसपर्यंत आहे. त्यामुळे शीतपेयांच्या मागणीत कमालीची वाढ झाली असल्याने लिंबू उत्पादकांना अच्छे दिन आले आहे. (Solapur Market) सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल 250 रुपये किलो असा लिंबाला दर मिळत आहे. गेल्या 10 वर्षात झाले नाही ते यंदाच्या उन्हाळ्यात घडले आहे. उन्हामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असली तरी लिंबू उत्पादकांना अशा परस्थितीमध्येही दिलासा मिळत आहे.

राज्यातील सर्वाधिक दर सोलापुरात

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्थानिक शेतकऱ्यांचेच लिंबू दाखल होत आहे. उत्पादनात घट झाल्याने आवकही अटोक्यात आहे. शिवाय लिंबाच्या आवकवरच दर ठरत आहे. गेल्या चार दिवसांपासून आवक घटल्याने लिंबाचे दर थेट 250 रुपयांवर गेले आहे. म्हणजेच एक लिंबू जवळपास 10 रुपयांना मिळत आहे. हा राज्यातील सर्वाधिक दर असल्याचे व्यापारी अल्ताफ लिंबूवाले यांनी tv9 मराठीशी बोलताना सांगितले आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये उन्हात प्रचंड वाढ झाली आहे. शीतपेयासाठी लिंबाचा वापर वाढत आहे. त्यामुळे शेतकरी बाजारपेठेत दाखल होण्यापूर्वी किरकोळ विक्रेते येऊन बसत आहेत.

अवकाळीमुळे मात्र उत्पादन घटलं

अवकाळी पावसाची अवकृपा हंगामी पिकांवरही कायम आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे लिंबू परिपक्व होण्यापूर्वीच गळती झाली तर जमिनीवर पडलेली लिंब ही डागाळलेली आहेत. त्यामुळे दरावर परिणाम झाला आहे. ऐन लिंबा बागा बहरात असतानाच वातावरणात बदल झाल्याने उत्पादनात घट झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आता दर चांगला आहे पण माल कमी अशी अवस्था आहे. कधी कवडीमोल दरामुळे तर कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान हे ठरलेलेच असल्याचे शेतकरी नारायन साठे यांनी सांगितले आहे.

आवक घटल्यास अणखी दरात वाढ

गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 250 रुपये किलो असा दर मिळत आहे. शिवाय आतापर्यंत मागणी तेवढा पुरवठा झाला आहे. पण असेच ऊन वाढत गेले तर मागणीत वाढ आणि पुरवठ्यात कमी अशी स्थिती ओढावणार आहे. त्यामुळे भविष्यात लिंबाच्या दरात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहे. यंदा मात्र, मुख्य पिकांमधून नाही पण हंगामी पिकांचा शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे.

संबंधित बातम्या :

Basmati Rice: बासमती तांदळाच्या निर्यातीचा मार्ग मोकळा, कृषी शास्त्रज्ञांची संशोधन आले कामी..!

Sugar Rate : वाढत्या उन्हाबरोबर साखर उद्योगाचाही वाढला गोडवा, नेमका परिणाम काय ?

मोहीम फत्ते : कृषी विभागाचे आवाहन अन् शेतकऱ्यांच्या प्रयत्नाने मिटला खरिपाचा प्रश्न, बियाणाच्या बाबतीत शेतकरी आत्मनिर्भर

Follow Us
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार
मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा; मुंबईत मराठ्यांना येण्याचे आवाहन
असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद अंतिम टप्प्यात. असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी: धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
भावेश कावरेच्या वादग्रस्त जाहिरातीवरून राज्यात संताप: मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
नीट परीक्षा आणि तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... गांधींवर मस्केंची टीका
Naresh Maske | दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... राहुल गांधींवर नरेश मस्केंची बोचरी टीका!
देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार मुंबईसाठी २३८ एसी लोकल मंजूर
मुंबईला मिळणार २३८ एसी लोकल; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार